पुणे : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता नगरपालिकेच्या निवडणुका होण्यासाठी मार्ग मोेकळा झाला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते वसंत मोरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. कितीही तोडा, कितीही जोडा आम्ही लढायला तयार आहोत. पुण्याचा आगामी महापैर हा मनसेचा होईल. हिम्मत असेल तर निवडणुकांना सामोरे जा. पुण्याचा महापौराची निवड जनतेतून करा असंही वसंत मोरे म्हणाले.
संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली
2017 च्या निवडणुकीनंतर आता 2022 ची महापालिका निवडणुका लागलेली आहे. यामध्ये महाविकास आघाडीने तीन सदस्यीय पद्धतीला परवानगी दिली. यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीन सदस्यीय पद्धतीतील सर्व कार्य पुर्ण झाले. अगदी मतदान केंद्र पाहणी झाली. मतदार यादी फोडल्या गेल्या सगळं काही झालं असताना पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार कडून चारचा प्रभाग केला जात आहे. यामध्ये नागरीकांचा कोणीच विचार करताना दिसत नाही, प्रत्येक जण स्वत:च्या पक्षाचा विचार करत आहे. माझ्या पक्षाचे जास्तीत जास्त कसे उमेदवार निवडून येतील याचा प्रत्येक पक्ष विचार करत आहे. यामुळे नागरीकांची कामे किंवा विकासकामांना कुठेच महत्व दिले जात नाही. फक्त आपल्या पक्षाचे सभासद कसे जास्त निवडून येतील याला महत्व दिले जात आहे, असा टोलाही मनसे नेते वसंत मोरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर लगावला आहे.
संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली
शिंदे-फडणवीस सरकारला आणि इतर पक्षांना एकच सांगणे आहे की, तीन-चार कितीही प्रभाग करा पण हिम्मत असेल तर, महापैर हा जनतेतून निवडून दाखवा असा इशारा देत. जर पुण्याचा महापौर जनतेतुुन निवडला गेला, तर शंभर टक्के पुण्याचा महापौर हा मनसेचा असेल असा विश्वास ही वसंत मोरे यांनी व्यक्त केला. पण ती हिम्मत यांच्यात नाही यांच्यात फक्त प्रभाग रचना तोडायची, प्रभाग फोडायचा ही सगळा खेळ चाललेला आहे.
“मंत्रिमंडळ विस्तार प्रश्न गरजेचा नाही, पण शिवसेना प्रहारमध्ये विलीन करू नका”
पुणे शहरातील प्रशासन एवढं माजलेलं आहे की त्यांना कोणत्याही विकासकामांकडे, नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. याच्यांवरती कोणाताच अंकुश राहिलेला नाहीये, याला जबाबदार महाविकास आघाडी सरकार आहे. जर सगळी कामे पुुर्ण झाली होती तर फेब्रुवारी-मार्चमध्ये महाविकास आघाडीन निवडणुका घेणे गरजेचे होते. आरक्षण आता जाहीर झाले आहे तरी आता निवडणुकांना का घाबरता आहात? असा सवालही वसंत मोरे यांनी केला आहे.
Read also
- “राज्यपालांचा 250-350 वर्षांचा इतिहास कच्चा, मात्र कालचं भाषण बघता ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो”
- यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी अन् वनविभागाचे अधिकारी यांच्यात खडाजंगी..
- निष्ठा असावी तर अशी..! शिवसैनिकांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून ठाकरेंना दिला पाठिंबा
- “आमचे शिवसैनिक पळून जाणारे नाहीत, त्यांनी थांबून तुम्हाला ठोकलं असतं”
- फडणवीसांचा दिल्ली दौरा, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी नाही, अंतर्गत कलह अटळ