पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनांवर पुण्यातील कात्रजमध्ये हल्ला झाला. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र हल्ला करणारे कोण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले की यामागे शिवसेनेचा काहीही संबंध नाही. तर आता पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
“आमचे शिवसैनिक पळून जाणारे नाहीत, त्यांनी थांबून तुम्हाला ठोकलं असतं”
खासदार अरविंद सावंत आणि दोनदा दहावी नापास खासदार विनायक राऊत कायदे तज्ञ कधीपासुन झाले? असा सवाल केला. जो माणुस दहावीमध्ये दोन वेळा नापास आहे, असा माणुस जर कायदा शिकवायला लागला तर महाराष्ट्र संकटात येईल. जो माणुस दहावीमध्ये दोन वेळा नापास झालाय त्याचा कायद्याशी काय संबंध असा टोला भाजप नेते निलेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांच्यावर लगावला आहे.
फडणवीसांचा दिल्ली दौरा, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी नाही, अंतर्गत कलह अटळ
मागच्या अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते, त्या वेळी लोकांवर 307 कलम टाकली ती विसरला का, किती लोकांना तडीपार लावल्या, सायबर क्राईमने किती मुलांवर गुन्हे नोंद केले. त्यांच्या आई-वडीलांना किती त्रास झाला, त्यावेळी नाय आठवले की 307 कसं लागु होतं. किती लोकांवर 307 लावलेलं आहे. तुम्ही आणि उद्धव ठाकेरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले की ह्याच्यावर 307 लावा, त्याला आत टाका, ह्याला तडीपार करा, असं भाजप नेते निलेश राणे म्हणाले.
संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली
भाजपच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर केसेस बनवल्या गेल्या. खादार विनायक राऊत काय गजनी झालाय का विसरलात का, हे जे तुम्ही करताय ते सीसीटिव्ही मध्ये दिसतय नशिबाने तुम्ही वाटलात नायतर 302 चीच केस होती. कायदा हा विषय पोलीस आणि वकिलांचा आहे तो त्यांना करू द्या तुम्ही नाय त्या भानगडीत पडु नका, हे तुमचं क्षेत्र नाही, हा तुमचा विषय नाही म्हणुन जशी कारवाई चाललीय ती चालु द्या हे ठाकरे सरकार नाही एक तर्फी करवाई होयला असा टोलाही निलेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांच्यावर लगावला आहे.
खासदार अरविंद सावंत आणि दहावी दोनदा नापास खासदार विनायक राऊत कायदे तज्ञ कधीपासून झाले?? pic.twitter.com/X8WGOCv4VL
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 5, 2022
माजी मंत्री उदय सामंतांवर झालेल्या हल्ल्याच्या तक्रारीवर दहावी नापास Adv विनायक राऊत याची प्रतिक्रिया ऐकली, IPC कलम 307 कुठे लागू होतो कुठे नाही हे विनायक राऊतला कळणार नाही कारण त्याच्यावर फक्त IPC कलम 420 च्याच केसेस पडल्या आहेत. स्वतःवर 307 केस पडली तेव्हा यांची कडी पातळ झाली.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 4, 2022
Read also
- “मोदींनी अजून शौचाल्यावर कर लावला नाही, याचं श्रेय शौचालय सम्राट ‘भातखळकर’ यांना जातं”
- “महापौराची निवडही जनतेतून करा, मग शंभर टक्के पुण्याचा महापौर हा मनसेचा असेल”
- “राज्यपालांचा 250-350 वर्षांचा इतिहास कच्चा, मात्र कालचं भाषण बघता ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो”
- यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी अन् वनविभागाचे अधिकारी यांच्यात खडाजंगी..
- निष्ठा असावी तर अशी..! शिवसैनिकांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून ठाकरेंना दिला पाठिंबा