पुणे : भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला आहे. याविरोधात आज काॅंग्रेसने देशभरात आंदोलन पुकारलं आहे. यावेळी काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
फडणवीसांचा दिल्ली दौरा, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी नाही, अंतर्गत कलह अटळ
देशात सध्या महागाईने सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट बिघडलं आहे. जुलै पासून अनेक वस्तूंवर केंद्र सरकारने जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशानात देखील याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. यावरून देशव्यापी आंदोलन देखील करण्यात आले. यातच मोदींनी अजून शौचाल्यावर कर लावला नाही, याचं श्रेय निर्वीवादपणे शौचालय सम्राट अतुल भातखळकर यांना जातं. अशी खोचक टिप्पणी प्रशांत जगताप यांनी केलं आहे.
संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. याआधी आपण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही काळ पाहिला आहे. मात्र नरेंद्र मोदी हे देशासाठी वीस तास करणाऱ्या पंतप्रधानांपैकी एक आहेत. असं वक्तव्य राज्यपालांनी केलं. त्यावर ते बोलताना ते म्हणाले की, मोदीभक्तीत तल्लीन झालेल्या अंधभक्तांच्या मेंदूत किती घाण साचली आहे हे या वक्ताव्यातून दिसून येते. स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी या युगपुरुषांनी संपूर्ण जगात देशाला ओळख मिळवून दिली. या सर्वांचे योगदान नाकारणे हा देशद्रोह आहे. असंही देखील प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. देशाचा स्वाभीमान जागृत झाला आहे. नाहीतर याआधी काहीच करण्यासारखे नाही. यांच्या पद्धती खराव, हा गुलामांचा देश आहे, असाच समज होता. परंतु आमचा इतिहास गौरवशाली आहे. अलेक्झांडर, मुघल आणि ब्रिटिशांनाही या देशाने धुळ चाखली आहे. आज मोदींमुळे देश जागृत आहे. असंही म्हणाले.
मोदींनी अजून शौचाल्यावर कर लावला नाही, याचं श्रेय निर्वीवादपणे शौचालय सम्राट @BhatkhalkarA यांना जातं.
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) August 4, 2022
Read also
- “महापौराची निवडही जनतेतून करा, मग शंभर टक्के पुण्याचा महापौर हा मनसेचा असेल”
- “राज्यपालांचा 250-350 वर्षांचा इतिहास कच्चा, मात्र कालचं भाषण बघता ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो”
- यशवंत ब्रिगेडचे पदाधिकारी अन् वनविभागाचे अधिकारी यांच्यात खडाजंगी..
- निष्ठा असावी तर अशी..! शिवसैनिकांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून ठाकरेंना दिला पाठिंबा
- “आमचे शिवसैनिक पळून जाणारे नाहीत, त्यांनी थांबून तुम्हाला ठोकलं असतं”