मुंबई : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या प्रभाग रचनेत शिंदे फडणवीस सरकारने बदल केल्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच महापालिकांसाठी प्रभागरचनेत 3 ऐवजी 4 केली आहे. तसेच जिल्हा परिषदांमधील वाढीव गट आणि गण यांच्या संख्येत देखील यामुळे घट झाली आहे. या साऱ्या गोष्टी नव्याने करण्यासाठी किमान 4 महिन्यांचा कालवधी लागणार आहे.
राज्यात 23 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या निवडणुकांना आता पुढच्याच वर्षी मुहर्त लागणार आहे. तसेच राज्य निवडणुक आयोगाने आज होणारी नऊ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित केली आहे. त्यामुळे अन्य 14 महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रसिद्ध कऱण्यात येणारी अंतिम आरक्षणाची अधिसुचना देखील स्थगित कऱण्याचे निर्देश राज्य निवडणुक आयोगाने दिले आहेत.
“आई-वडीलांना किती त्रास झाला, त्यावेळी नाही आठवले का 307 कलम”; राणेंचा विनायक राऊतांना सवाल
राज्यातील जिल्हा परिषदा आणि अनेक महापालिकांची मुदत मार्च 2022 मध्ये संपली आहे. त्या आधी कोरोनामुळे कोल्हापुर, नवी मुंबई, औरंगाबाद या शहरांतील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच दरम्यान ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजू लागला. त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेचा निवडणुक आयोगाकडील अधिकार कायदा करून काढून घेतला. आता त्याच कायद्याच्या आधारे फडणवीस आणि शिंदे सरकारने प्रभागरचना आणि गण गट यामध्ये बदल केला आहे.
“मोदींनी अजून शौचाल्यावर कर लावला नाही, याचं श्रेय शौचालय सम्राट ‘भातखळकर’ यांना जातं”
राज्यातील औरंगाबाद, नांदेड, वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपुर, भिवंडी- निजामपुर, मालेगाव, पनवेल आणि मीरा भाईंदर या 9 महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यामुळे ते आता काढण्यात येणार नाहीत. त्याचबरोबर बृहमुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापुर, कोल्हापुर, नाशिक, अकोला, अमरावतील आणि नागपुर या 14 महापालिकांच्या आरक्षणाची अंतिम अधिसुचना देखील प्रसिद्ध केली जाणार आहे.
Read also
- “अजित पवार माध्यमांशी बोलताना गोंधळले; म्हणाले, मी राज्याचा उप..”
- कावळे संपतील, गायी राहतील..! जे. पी नड्डाजी, जरा जपून..!
- “आता सामनात नुसते टोमणे असणार”; मनसेचा खोचक टोला, सामनाच्या मुख्य संपादकाची उद्धव ठाकरे
- “ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील, पण राजकीय गुरू मात्र, एकनाथ शिंदेंच”
- “मुंबई पालिकेवर भाजपची सत्ता आली की, शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही”