बारामती : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना अनेक नेत्यांचा गोंधळ उडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापुर्वी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा पंतप्रधान देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला होता. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला. यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार हेही माध्यमांशी बोलताना गोंधळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहेत.
“आई-वडीलांना किती त्रास झाला, त्यावेळी नाही आठवले का 307 कलम”; राणेंचा विनायक राऊतांना सवाल
अजित पवार नेहमी प्रमाणे माध्यमांशी बोलताना स्वत:चा उल्लेख राज्याचा उपमुख्यमंत्री असा करत होते. परतु हा शब्द पुर्ण करण्याआधी त्यांच्या लक्षात आले व त्यांनी लगेच बाजू सावरत विरोधी पक्षनेता असा उल्लेख केला. मात्र याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले व भाजप सोबत एकनाथ शिंदे यांनी युती करत सरकार स्थापन केले आहे.
“मोदींनी अजून शौचाल्यावर कर लावला नाही, याचं श्रेय शौचालय सम्राट ‘भातखळकर’ यांना जातं”
अजित पवार पुणे जिल्ह्यातील बारामतीत होते. यावेळी अजित पवार यांना परमबीर सिंह वसुली प्रकरणात निलंबित डीसीपी पराग मनेरे यांचं निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेतल्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देतांना अजित पवार म्हणाले की, मला त्यासंदर्भात काही माहीती नाही, मी कालपासून दौऱ्यावर आहे. मी तिथे गेल्यानंतर त्यांची माहिती घेईन. आज मी राज्याचा उप..विरोधी पक्षनेता म्हणुन तुमच्याशी बोलतो. त्यामुळे मी पुर्ण माहिती घेऊन त्याआधारे स्टेटमेंट करेन, मी गेल्यानंतर सोमवारी त्याबद्दल माहिती घेईन असं अजित पवार म्हणाले.
“महापौराची निवडही जनतेतून करा, मग शंभर टक्के पुण्याचा महापौर हा मनसेचा असेल”
एखादी सवय लागण्यासाठी किंवा सुटण्यासाठी 21 दिवस लागतात असं म्हटलं जातं. इथे तर अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे उपमुख्यमंत्री होतो. सत्तेत असो वा नसो अजित पवार यांचं काम थांबलेलं नाही. उपमुख्यमंत्री असतानाही ते काम करत होते आणि आता विरोधी पक्षनेता असतानाही ते राज्यातील पूरग्रस्त भागात दौरा करत आहेत.
Read also
- कावळे संपतील, गायी राहतील..! जे. पी नड्डाजी, जरा जपून..!
- “आता सामनात नुसते टोमणे असणार”; मनसेचा खोचक टोला, सामनाच्या मुख्य संपादकाची उद्धव ठाकरे
- “ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील, पण राजकीय गुरू मात्र, एकनाथ शिंदेंच”
- “मुंबई पालिकेवर भाजपची सत्ता आली की, शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही”
- कंगना अन् मोदीजींच्या म्हणण्यानुसार देश 2014 ला स्वातंत्र झाला, मग हा महोत्सव नेमका कोणता साजरा होतोय?