मुंबई : राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 62 तालुक्यांतील 238 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 78 टक्के मतदान झाले असल्याची माहिती राज्य निवडणुक आयोगाने दिली आहे. यामध्ये बहुतेक ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने वर्चस्व मिळवत ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. त्यामुळे या निकालामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अशातच सांगलीमध्ये राष्ट्रवादीने 3 प्रभागांमध्ये बाजी मारली आहे.
“मुंबई पालिकेवर भाजपची सत्ता आली की, शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही”
सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी एकुण मतदार संख्या 677 होती आणि 378 जणांनी मतदान केले. 3 प्रभागांमध्ये 7 जागासाठी 14 उमेदवार निवडणुक रिंगणात उभे होते. या निवडणुक भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना धक्का देत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पक्षाच्या रोहित आर. आर. पाटील यांनी पुन्हा बाजी मारली आहे. त्यांच्या पॅनेलच्या 7 च्या 7 सर्व उमेदवार विजयी झाले आहे.
अलिकडेच झालेल्या कवठेमहाकाळ नगरपरिषद निवडणुक रोहित पाटलांनी दमदार बाजी मारली होती. त्यामुळे आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत देखील रोहित पाटलांनी राष्ट्रवादीच्या गळ्यात माळ घातली आहे. त्यामुळे आता आबांचं पोरं राजकारणात सेट होतंय. अशा प्रतिक्रिया सध्या गावमाथ्यावर उमटू लागल्या आहेत. छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीपैकी 10 ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या शिंदे गटाला वर्चस्व मिळाले आहे . तर शिवसेनेच्या ठाकरे गटाला 15 पैकी केवळ 1 ग्रामपंचायतमध्ये यश मिळालं आहे. काँग्रेसला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. भाजपला 1 ठिकाणी यश मिळालं. तर पैठणमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या संदीपान भुमरे गटाने ७ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.
“आई-वडीलांना किती त्रास झाला, त्यावेळी नाही आठवले का 307 कलम”; राणेंचा विनायक राऊतांना सवाल
सातारा जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात गेली. त्यामुळे उत्तर तांबवे ग्रामपंचायतीत 22 वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. धुळे जिल्ह्यात शिंदे गटाने 20 ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे.
Read also
- इच्छुकांना अजून कळ काढावी लागणार; महापालिका, ZP निवडणुका आता पुढच्याच वर्षी
- “अजित पवार माध्यमांशी बोलताना गोंधळले; म्हणाले, मी राज्याचा उप..”
- कावळे संपतील, गायी राहतील..! जे. पी नड्डाजी, जरा जपून..!
- “आता सामनात नुसते टोमणे असणार”; मनसेचा खोचक टोला, सामनाच्या मुख्य संपादकाची उद्धव ठाकरे
- “ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील, पण राजकीय गुरू मात्र, एकनाथ शिंदेंच”