मुंबई : राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 78 टक्के मतदान झाले असल्याची माहिती राज्य निवडणुक आयोगाने दिली आहे. राज्यात २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपने निर्विवाद पहिला क्रमांक मिळविला असून निवडणुकांमध्ये नंबर वन राहण्याची परंपरा पक्षाने टिकविली आहे. या यशाबद्दल आपण भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
“ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील, पण राजकीय गुरू मात्र, एकनाथ शिंदेंच”
चंद्रकांत पाटील म्हणाले की, शुक्रवारी दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यात ठिकठिकाणी काल मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निर्विवाद यश मिळविले असून भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मिळविलेल्या विजयाचा विचार केला तर भाजपा-शिवसेना युती आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा खूप पुढे आहे. या यशाबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. राज्यात सत्ताबदल होऊन भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेली ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे व त्यामध्ये जनतेने युतीला पसंती दिली आहे.
“मुंबई पालिकेवर भाजपची सत्ता आली की, शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही”
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे आणि विकासाचा अजेंडा राबविणारे युतीचे सरकार हवे या भूमिकेतून बदल झाला. त्यानंतर जनतेने दिलेला आशिर्वाद खूप महत्त्वाचा आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल.
सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी एकुण मतदार संख्या 677 होती आणि 378 जणांनी मतदान केले. 3 प्रभागांमध्ये 7 जागासाठी 14 उमेदवार निवडणुक रिंगणात उभे होते. या निवडणुक भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना धक्का देत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पक्षाच्या रोहित आर. आर. पाटील यांनी पुन्हा बाजी मारली आहे. त्यांच्या पॅनेलच्या 7 च्या 7 सर्व उमेदवार विजयी झाले आहे.
Read also
- पाटलांच लेक राजकारणात होतंय सेट
- इच्छुकांना अजून कळ काढावी लागणार; महापालिका, ZP निवडणुका आता पुढच्याच वर्षी
- “अजित पवार माध्यमांशी बोलताना गोंधळले; म्हणाले, मी राज्याचा उप..”
- कावळे संपतील, गायी राहतील..! जे. पी नड्डाजी, जरा जपून..!
- “आता सामनात नुसते टोमणे असणार”; मनसेचा खोचक टोला, सामनाच्या मुख्य संपादकाची उद्धव ठाकरे