पुणे : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर मनसेने टीका केली होती. शिंदे गटाकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. अशावेळी भाजप व मनसेही शिवसेनेवर टीका करताना दिसत आहे. वारसा हा वास्तूचा नसून विचारांचा असतो, असं म्हणत शिवसेनेला मनसेनं डिवचलं होतं. त्याला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“भाजपसोबत युती म्हणजे दो दिनकी चांदी फिर अंधेरी रात”
कुठल्याही कार्यकर्त्याला आपल्या नेत्याबद्दल आपुलकी वाटणं, आपला नेता हिरोईक आहे असं वाटने फार स्वाभावीक आहे. मनेसे कार्यकर्त्यांना वाटत असेल आमचा नेता हा ही विचारधारा खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाणारा आहे, तर हे चित्र खुप आशादायक आहे. यावर आक्षेप घेण्यासारखं देखील काहीच नाही. मात्र एक गोष्ट नक्की जेव्हा आपले कार्यकर्ते प्राणपणाने लढतात, आपल्या एका इशाऱ्यावरती ते मरायला आणि मारायला तयार होतात. तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांना एका विधायक दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी ही नेत्याची असते. कारण जे जाणते असतात ते नेेते होतात. नेत्यांनी नेत्यांना जाणते करायचे असते. नेत्यांनीच नेतेपणाने वागायचे नसते.
“संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावरील व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे”; भाजपची मागणी
जेव्हा कार्यकर्ते आपल्या नेत्यांबद्दल एवढ्या विश्वसाने बोलत आहेत. तेव्हा ही मनसे नेत्याची अजून जास्त जबाबदारी तयार होते की त्यांनी गांभिर्याने विचार करावा आणि स्वत:ला काही प्रश्न विचारावेत. तुम्ही खरोखरच बाळासाहेबांचा वारसा चालवत आहात की भाजपच्या अजिंड्यावर काम करताय. बाळासाहेबांनी निर्माण केलेली प्रादेशिक अस्मिता, बाळासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष आणि पक्षाचा विचार संपवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने काम सुरू आहे. आपण काय करतोय हे एकदा त्यांनी ठरवलं पाहिजे, असा टोला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना लगावाला आहे.
सोबतच, शिवतीर्थ वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे. आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वारसा हा वास्तूचा नसतो. तर विचारांचा असतो, असं मनसे नेते संदिप देशपांडे म्हणाले आहेत.
Read also
- “शिवसेनेशी गद्दारी एकनाथ शिंदेंनी नाही तर उद्धव ठाकरेंनी केली”; नारायण राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका
- “कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ‘ईडी सरकार’ लवकरच ‘रनआऊट’ होईल”
- भाजपचं लक्ष्य आता बारामती, भाजप प्रदेशाध्यक्ष 5 सप्टेंबर रोजी दौऱ्यावर येणार
- “टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचीही चौकशी व्हावी”; शिवसेनेची मागणी
- “शिवतीर्थवर होणारा ‘दसरा मेळावा’ म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे”