बुलडाणा : बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी करोनाला हरवण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी चिकन, मटन आणि अंडी खाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, अनेकांना त्यांचे हे म्हणणे पटले नसून, त्यांच्या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.
‘करोनाला हरवण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. ही शक्ती चिकन, मटन आणि अंडे खाल्ल्याने वाढेल यासाठी मासाहारी पदार्थ सेवन करा,’ असं आवाहन संजय गायकवाड यांनी केले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर काही वारकऱ्यांनी आक्षेप घेत त्यांना जाब विचारला आहे.
कोरोनाच्या नावाखाली हिंदू सनातन धर्मीयांना मांसाहाराकडे वळवण्याचा आमदार संजय गायकवाड यांचा प्रयत्न करत असून, वारकऱ्यांच्या आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप त्यांच्यावर आता केला जात आहे. एका वारकरी आणि गायकवाड यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल होत आहे.
या वादानंतर देखील संजय गायकवाड आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का?, असा सवाल त्यांनी टीका करणाऱ्यांना विचारला आहे. ‘मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. मी जे बोललो तो आज देशाचा डायट प्लॅन आहे. मांसाहार सेवनाचे आवाहन केंद्र शासनापासून तर राज्य शासन नेहमीच करत आले आहे. मात्र, भाजपाच्या वारकरी सेलकडून या विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असा आरोप बुलडाण्याचे शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी केला आहे.
Read Also :
- महाविकास आघाडीत वाद ? मुख्यमंत्री ठाकरेंची पवारांकडे नाराजी
- ‘मराठा समाजाचं आंदोलन होऊ नये म्हणून लॉकडाऊन वाढवला’
- अक्षय तृतीयेदिवशी मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट, जमा होणार किसान योजनेचा आठवा हप्ता
- ‘शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात आणि…’
- मराठा आरक्षण : ‘तातडीने ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार’