मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन आता दीड वर्षांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अलबेल नसल्याची चर्चा देखील अनेकदा समोर आली आहे. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीत वाद निर्माण झाल्याची चर्चा असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठिणगी पडल्याचे सांगितले जात आहे.
जलसंपदा विभागाच्या कामावरून मुख्यमंत्री ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत याबाबत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे म्हणजे शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. टिव्ही9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रशासनाला हाताशी धरुन राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करु पाहत असल्याचा आरोप केला जातोय. राष्ट्रवादीची ही नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंतही पोहोचवली जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे.
यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चा बाहेर न सांगण्याची परंपरा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात चर्चिले गेलेले विषय बाहेर सांगू नयेत, असे मला वाटले. बाकी मला जे काही बोलायचे आहे ते मी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Read Also :
- ‘मराठा समाजाचं आंदोलन होऊ नये म्हणून लॉकडाऊन वाढवला’
- अक्षय तृतीयेदिवशी मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट, जमा होणार किसान योजनेचा आठवा हप्ता
- ‘शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात आणि…’
- मराठा आरक्षण : ‘तातडीने ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार’
- मराठा आरक्षणावर केंद्राची पुनर्विचार याचिका, अशोक चव्हाण म्हणाले…