मुंबई : शिवसेना कार्यकर्ते शरद पवार यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लिहिलेले पत्र चर्चेत आहे. लोकाधिकार चळवळीतील कार्यकर्ते व ‘शिवसेना दैनंदिनी’ चे प्रणेते अशी शरद पवार यांची ओळख होती. त्यांचे निधन चटका लावणारे असल्याचे म्हणत अरविंद सावंत यांनी एक भावूक पत्र लिहिले आहे.
शरदचा चटका लावणारा अस्त !आमच्या लोकाधिकारचा एक तारा शरद पवार गेल्याची दुःखद बातमी आली… मी नि:शब्द झालो. गेली अनेक वर्षे हा साहेबांचा कडवट शिवसैनिक लोकाधिकारच्या चळवळीत झोकून देऊन काम करीत होता. पण शरद आणि जी एस यांनी स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आणि ती शिवसेना दैनंदिनीची. ती दैनंदिनी म्हणजे शिवसेनेची डिरेक्टरी होती. शिवसेनेच्या अधिकृत, अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी त्यांचे नंबर या सर्वांची इत्यंभुत माहिती त्यात असे, असे सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.
शरदचा चटका लावणारा अस्त !
आमच्या लोकाधिकारचा एक तारा शरद पवार गेल्याची दुःखद बातमी आली… मी नि:शब्द झालो.
गेली अनेक वर्षे हा साहेबांचा कडवट शिवसैनिक लोकाधिकारच्या चळवळीत झोकून देऊन काम करीत होता.
पण शरद आणि जी एस यांनी स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आणि ती शिवसेना दैनंदिनीची. pic.twitter.com/2PlxooWGVb— Arvind Sawant (@AGSawant) May 14, 2021
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नेत्याच्या नावाशी आपल्या नावाचे साधर्म्य याते त्याला कोडं कौतुक होते, त्याची तो मजा घ्यायचा. आम्हीही तेव्हा शिवसेनेतील शरद पवार आले अश चेष्टा करायचो, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
शिवसैनिक शरद पवारच्या अलिकडच्या भेटीबाबत ते पत्रात म्हणाले की, अलीकडच्या काळात माझ्या कार्यालयात अनेकदा येऊन गेला. एकदा त्याच्या चिरंजीवाला घेऊन आला. म्हटलं काय काम आहे का. नाही साहेब, तुमचा फॅन आहे म्हणून घेऊन आलो. माझ्याकडून काही योग्य घडलं, किंवा चांगला प्रतिवाद करताना दूरदर्शन वर पहिले की त्याचा फोन आलाच.
कोरोनात सारे कुटुंबच अडकले… पत्नी आणि तो एकाच हॉस्पिटलमध्ये पण ती गेल्याचा मागमुसही त्याला नव्हता. काल परवा सेव्हन हिल हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा त्याचा मुलगा भेटला. मला वाटले आता शरद नक्की बरा होऊन घरी येईल. पण कसचं काय आणि अखेर आज तोही सोडून गेला तेही अक्षय तृतीयेला! शिवसेनाप्रमुखांच्या एका निष्ठावंत शिवसैनिकांचा शरीररूपी क्षय झाला पण अक्षय स्मरणात राहील असे कार्य आणि आठवण ठेवून, अशा भावना अरविंद सावंत यांनी व्यक्त केल्या.
Read Also :
- अजून किती लोकांचा बळी घेणार आहात?, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला सवाल
- … म्हणून मुंबईत दोन दिवस लसीकरण केंद्र राहणार बंद
- ‘अशोकराव, आम्ही सत्ता तुमच्यासारखी चोरून आणली नाही’
- ‘चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची नितांत गरज’
- चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सुचना