मुंबई : सत्ता पुन्हा मिळत नसल्याने चंद्रकात पाटील ते बेताल विधाने करीत असून त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाण यांनी केंद्रावर टीका केली होती. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ‘अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे’, अशी खोचक टीका केली होती. या टीकेवरून आता अशोक चव्हाण यांन पलटवार केला आहे.
प्रचंड ताणतणावामुळे आ. चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 14, 2021
अशोक चव्हाण ट्विट करत म्हणाले की, सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने आ. चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बेताल विधाने करीत असून त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे, असा टोला लगावला.
प्रचंड ताणतणावामुळे आ. चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे, अशी बोचरी टीका करत अशोक चव्हाण यांनी पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Read Also :
- चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सुचना
- ‘मराठा समाजासाठी 3 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा’
- ‘कुठून हे नग मिळतात?’ भाजप नेत्याचा व्हिडीओ शेअर करत आव्हाडांची टीका
- ‘गुणरत्न सदावर्ते नीट बोल, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे’
- ‘जयंत पाटील-सीताराम कुंटे वादात कोणतेही तथ्य नाही’