सासवड : एखादे गाव महापालिकेत किंवा नगरपालिकेत समाविष्ट केल्यास कर एकदम वाढणार नाही याची काळजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर जून महिन्यात पावसाळी अधिवेशन या संदर्भात विधेयक आणले जाणार आहे. यातून हवेली, पुरंदर, खडकवसला भागातील नागरिकांना टॅक्समध्ये दिलासा देण्याचे काम केले जाईल, अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सासवडमध्ये बारामती करांसाठी दिली. बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीची जाहीर सभा पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे विजय बापू शिवतारे आदी उपस्थित होते.
हेही वाचा…“धुळ्यात शोभा बच्छावांना उमेदवारी जाहीर, कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा थेट राजीनामा”
गेल्या काही दिवसापुर्वी विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधात जहाल भूमिका घेतली होती. यावेळी त्यांनी बारामतीत अपक्ष म्हणून निवडणुक लढविण्याचा निर्णय देखील घेतला होता. मात्र मुख्यंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी बारामतीतून माघार घेतली. माघार घेता वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला काही आश्वासनं दिली होती. ती सांगण्यासाठी सासवडमध्ये सभा आयोजित केली असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर सभेत अजित पवार यांनी पुरंदरांसाठी तसेच संपुर्ण बारामतीकरांसाठी आश्वासांनाची खैरात वाटली.
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, एखादे गाव महापालिकेत किंवा नगरपालिकेत समाविष्ट केल्यास कर एकदम वाढतो. मात्र येथील कर एकदम न् वाढवता विकासाच्या तुलनेत टप्प्या टप्प्याने वाढवला जावा असा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे फुरसुंगी, उरूळी देवाची, खडकवासला आदी भागातील नागरिकांना फायदा होणार आहे.
हेही वाचा…“शिवतारेंना माघार घेतांना कोणतं आश्वासन दिलं होतं,” ? शिवतारे अन् अजित पवारांनी केलं स्पष्ट
पुरंदर भागातील विकास, रिंगरोड, पुरंदर विमानतळ आदींविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकांवर दमदाटी करून आम्हाला कोणताही विकास करायचा नाही. येथील विमानतळ ही काळाची गरज आहे. मात्र, शेतकऱ्यांची इच्छा आणि जनतेचा पाठिंबा असेल तरच हे विमानतळ उभे राहील. तसेच गुंजवणी धरण प्रकल्प उभारण्याचे काम वेल्हा, भोरकरांना कोणताही त्रास न देता आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन देखील पवार यांनी दिले.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, केवळ निधी मिळून उपयोग नाही पण त्याला राजकीय इच्छाशक्तीची देखील जोड पाहिजे, तरच विकास होवू शकेल. मागील 15 वर्षात जेवढा निधी तुमच्या विद्यमान खासदारांनी आणला असेल त्या पेक्षा जास्त निधी राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीचा उमेदवार आणेल याची खात्री मी देतो.
READ ALSO :
हेही वाचा…“कॉंग्रेस पक्षांतर्गत सुंदोपसुंदीने धंगेकर ग्रासले”, पक्षांतर्गत आणखी एक वाद चव्हाट्यावर
हेही वाचा…“शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय,” अजितदादा गटातल्या महिला नेत्याची कडाडून टिका
हेही वाचा…बारामतीत शिवतारेंचा बंड थंड का झाला ? शिवतारेंनीच केला मोठा खुलासा, म्हणाले….
हेही वाचा…देशहितासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून मोदींना पाठिंबा द्या”, अर्चना पाटलांचं मतदारांना आवाहन
हेही वाचा…“टकमक टोकावरून यावेळी अनंत गीतेंचा कडेलोट करणार”, भरत गोगावलेंनी अनंत गितेंना दिला कडक इशारा