धुळे : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. मात्र बच्छाव यांच्या उमेदवारीवरून धुळ्यात कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य रंगलं आहे. यावरून धुळ्याचे जिल्ह्याध्यक्ष श्याम सनेर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यातच बाहेरून उमेदवार आणून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांवर मीठ चोळण्याचे काम केलं आहे. असेही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“वहिनी..! बघा यंदा तुम्हीच खासदार होणार”, सुनेत्रा पवारांनी भोरमध्ये साधला महिलांशी संवाद
गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपल्यावर अ्याय झाल्याची प्रतिक्रिया श्याम सनेर यांनी दिलीय. ते म्हणाले की, अनेक नेत्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला. परंतु मी माझा मुळ विचार आणि कॉंग्रेसच्या विचारसरणीशी कधीही तडजोड केली नाही. आजही संविधानाची पुजा तसेच लोकशाही तत्वे जोपसणारा कार्यकर्ता आहे. कॉंग्रेस पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती. गेल्या ३० वर्षात कधीच एवढा व्यथीत झालो नाही. पण आता मला पक्ष श्रेष्ठींनी लोकसभेच्या उमेदवारीच्या महिनाभराच्या काळात केले आहे. सतत कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. सामान्य आणि गरीब असल्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा नेतृत्वाने बळी घेण्याचा काम केलं आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“अपघात की घातपात”, नाना पटोलेंना संशय, देवेंद्र फडणवीस म्हणाले की…
दरम्यान, धुळ्याचा उमेदवार तात्काळ बदला अन्यथआ निश्चित केलेल्या कार्यकर्त्याला धडा शिकवण्यास मागे पुढे बघणार नाही. मतदारसंघात असणार सक्षम उमेदवारच द्या बाहेरून उमेदवार नको, असे म्हणत श्याम सनेर यांनी कॉंग्रेसलाच कडक इशारा दिलाय. यातच काल सांयकाळी शोभा बच्छाव यांची कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासमोर आता भाजपचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांचं कडवं आव्हान असणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शिवतारेंना माघार घेतांना कोणतं आश्वासन दिलं होतं,” ? शिवतारे अन् अजित पवारांनी केलं स्पष्ट
हेही वाचा…“गेल्या पाच वर्षात मतदारसंघात खासदार फिरकलाच नाही”,आढळरावांचा कोल्हेंना खोचक टोला
हेही वाचा…“वडेट्टीवार भाजपमध्ये जातील म्हणणाऱ्या आत्रामांना वडेट्टीवारांनी चांगलचं फटकारलं,” म्हणाले…
हेही वाचा…“अल्पसंख्याक समाज सुज्ञ, तो महायुतीच्या पाठीमागे 100 टक्के उभा राहिलं”, तटकरेंचा विश्वास
हेही वाचा…“शेतकऱ्यांनी प्रश्न केला, अन् चंद्रकांत पाटलांना सभेतून काढता पाय घ्यावा लागला”, माढ्यात नेमकं काय घडलं ?