भंडारा : सध्या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. अशातच प्रचार सभा आटोपून परत येत असताना भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताच्या वेळी पटोले गाडीत नसतांना त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र अपघात की घातपात असा सवाल करत पोलिस पुढील चौकशी करेल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला वाटत नाही की नानाभाऊ घातपात वगैरे काही म्हणतील. मी स्वतः नाना पटोलेंना फोन केला होता. विचारपूस केली. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू. पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. वैचारिक सामना हा सातत्याने सुरु असतो. पण नाना पटोले हे आमचे मित्रच आहेत. अपघात झाला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी बचावलो पण अपघात मोठा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी परिस्थिती ना उद्भवली आहे ना उद्भवणार आहे. मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.”
हेही वाचा…पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का, धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश ?
प्रचारसभा आटोपून नाना पटोले माघारी येत होते. त्यावेळी भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे माठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा. असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, यावर नाना पटोले यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. काल भंडाऱ्यात आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून धडक देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनी एका बाजूने गाडीला पूर्ण घासत नेलं, आम्ही तर सुखरूप आहोत पण गाडीचं पूर्ण नुकसान झालं, जनतेच्या आशिर्वाद आणि प्रेमामुळे मी आज सुखरूप आहे. हा घातपात आहे का याचा पोलीस तपास करतील. असेही त्यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कार्यकर्त्यांची बाजू समजून घेऊन पुढे वाटचाल करू”, सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदमांनी दिला इशारा
हेही वाचा…मनसेच्या पाठिंब्यामुळे मोहोळांचं मताधिक्य वाढणार, काय सांगतात राजकीय गणितं?
हेही वाचा…शरद पवारांनी बारामतीत डाव टाकला, भाजपचाच ‘हा’ मोठा कार्यकर्ता फोडला