सोलापुर : महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला रणजित सिंह निंबाळकर यांच्यासह पालकमंत्री तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थिती होती. मात्र या मेळाव्यात एका शेतकऱ्यांनी शेतीसंदर्भात प्रश्न विचारला अन् त्यांनंतर त्या शेतकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर चंद्रकांत पाटलांना आपलं भाषणं आटोपता घ्यावं लागलं अन् कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णई येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात शेतकऱ्याने कांदा प्रश्न आणि शेतीप्रश्नावरून थेट चंद्रकांत पाटलांना जाब विचारला. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी त्या शेतकऱ्याची भेट घेतली. मात्र त्यानंतर काही कार्यकर्त्यांकडून आणि पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने सभेत एकच गोंधळ उडाला.
चंद्रकांत पाटलांच्या समोरच शेतकऱ्यांना धक्काबुक्की केल्याने हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्या शेतकऱ्याला सभेतून बाहेर काढले. या गोंधळामुळे पाटलांना आपलं भाषण गुंडाळावं लागलं. त्या शेतकऱ्याचे नाव संपतराव काळे असून त्यांनी आपले आयुर्वेदिक वनस्पती लागवडीमध्ये २२ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.
हेही वाचा…शरद पवारांनी बारामतीत डाव टाकला, भाजपचाच ‘हा’ मोठा कार्यकर्ता फोडला
मात्र केंद्र सरकारने परवानगी दिलेल्या कंपनीमुळे हा तोटा झाल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांना लावला. तसेच कांद्याचा प्रश्नही त्यांनी यावेळी मांडला. त्यानंतर शेतकरी काळे यांना उपस्थित भाजप पदाधिकाऱ्याने धक्काबुक्की करत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांवर बैठक गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. तर चंद्रकांत पाटलांना सभेतून काढता पाय घ्यावा लागला.
दरम्यान, यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टिका केली. ते म्हणाले की, प्रश्न विचारले की तोंड दाब आणि भुक्क्यांचा मार दे ही भाजपची संस्कृती. शेतकऱ्याने आपले प्रश्न मांडले तर भाजपच्या मंत्र्यांना आणि कार्यकर्त्यांना इतका त्रास का होतो? आपल्या हक्कासाठी शेतकरी दिल्लीला येत होते तेव्हा त्यांना रोखले. आता राज्यातील शेतकऱ्याने मंत्र्यांना प्रश्न विचारले तर भाजप कार्यकर्ते मंत्र्यासमोर शेतकऱ्यांना धक्काबुक्की करतात? शेतकरी विरोधी भाजपचा दिल्लीतील सत्तेचा मार्ग आता बळीराजा महाराष्ट्रातून अडवतील! असाही त्यांनी इशारा दिला.
READ ALSO :
हेही वाचा…“वहिनी..! बघा यंदा तुम्हीच खासदार होणार”, सुनेत्रा पवारांनी भोरमध्ये साधला महिलांशी संवाद
हेही वाचा…“अपघात की घातपात”, नाना पटोलेंना संशय, देवेंद्र फडणवीस म्हणाले की…
हेही वाचा…“कार्यकर्त्यांची बाजू समजून घेऊन पुढे वाटचाल करू”, सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदमांनी दिला इशारा
हेही वाचा…मनसेच्या पाठिंब्यामुळे मोहोळांचं मताधिक्य वाढणार, काय सांगतात राजकीय गणितं?