यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यातच आता त्यांच्यावर अजून एक आरोप एका महिलेने केला असून, संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोप या महिलेने केला होता. पीडित महिलेने घाटंजी पोलीस ठाण्याला पोस्टाने यासंबंधी तक्रार पाठवली होती.
न्यायालयच्या दणक्यानंतर अनिल देशमुखांना ईडीचे पाचव्यांदा समन्स!
दरम्यान, या प्रकरणी एसआयटीची स्थापन करण्यात आली असून, महिलेचा जबाब नोंदावण्यात आला आहे. त्यांनतर आता या प्रकरणी खुद्द आमदार संजय राठोड यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. आता दोन्हीकडच्या बाजू ऐकून, तपासून घेतल्यानंतर एसआयटी समिती अहवाल सादर करणार आहे.
“बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या घरफोड्या शिवसैनिकाला स्मृतीस्थळाची भेट घेऊ देणार नाही!”
दुसरीकडे, माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. माझे राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न होत आहे. माध्यमातूनही ब्रेकिंग न्यूजसाठी शहानिशा न करता खोटी बातमी दिली जात आहे. अशा प्रकारामुळे एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. ही स्पर्धा जीवघेणी ठरू नये. माध्यमांनी प्रकरण समजून घ्यावं,” असं प्रतिक्रिया संजय राठोड यांनी यावर मांडली होती.
राज्य भाजप नेत्यांवर पंकजा मुंडे अजूनही नाराज? रावसाहेब दानवेंचा मोठा खुलासा!
त्यामुळे, या प्रकारांत लवकरच मोठा खुलासा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, योग्य ती शहानिशा करूनच माध्यमांना या प्रकरणातील वस्तुस्थिती सांगितली जाणार असल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे.
Read Also :
- शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य
- फरार गजानन काळेंना लवकरात लवकर अटक व्हावी, संजीवनी काळे यांचे केंद्रीय मंत्र्याना साकडे
- या सरकारने राज्यातील जातीय स्थिती बिघडवली, आघाडी सरकारकडून जनतेची फसवणूक सुरु
- सचिन वाझे यांच्यासोबत अनिल देशमुखांना एकाच कोठडीत राहावं लागेल – किरीट सोमय्या
- …तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेची आक्रमक भूमिका