सिंधुदुर्ग : भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला १६ ऑगस्टपासून सुरुवात झाली. राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून ही मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील या चारही नेत्यांना घेऊन ही यात्रा सुरु करण्यात आली आहे.
राज्य भाजप नेत्यांवर पंकजा मुंडे अजूनही नाराज? रावसाहेब दानवेंचा मोठा खुलासा!
डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील या नेत्यांच्या यात्रेला सुरुवात झाली असून, येत्या १९ ऑगस्टपासून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. यावेळी दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून ते यात्रेला सुरुवात करणार आहेत.
शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य
मात्र, यावरून आता पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राणेंच्या या कृतीला शिवसेनेने विरोध केला असून, “स्मृती स्थळाला भेट देण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही. त्यांना शिवसैनिक स्मृती स्थळावर फिरकूही देणार नाही,” असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.
फरार गजानन काळेंना लवकरात लवकर अटक व्हावी, संजीवनी काळे यांचे केंद्रीय मंत्र्याना साकडे
“नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांच्यासारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता संपूर्ण महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अश्या घरफोड्याला आम्ही त्यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाही,” असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
Read Also :
- या सरकारने राज्यातील जातीय स्थिती बिघडवली, आघाडी सरकारकडून जनतेची फसवणूक सुरु
- सचिन वाझे यांच्यासोबत अनिल देशमुखांना एकाच कोठडीत राहावं लागेल – किरीट सोमय्या
- बैलगाडा शर्यत चालू करा; पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
- …तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेची आक्रमक भूमिका
- राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे; संदीप देशपांडेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल