मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात दमदार भाषण केलं. यामध्ये त्यांनी वैयक्तिक आयुष्य़, बंडखोरीमागील कारणं, शिवसेनेत असताना केलेली कामं, तसेच अनेक राजकीय किस्से सांगत सभागृह दणाणून सोडलं. तसेच शिंदे सरकार या राज्यातील कष्टकरी, सर्वसामान्य लोकांचे हिताची काम करतील अशी असं आवाहन देखील त्यांनी जनतेला दिलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक घटना आपण पाहिल्या तर लोकप्रतिनिधी, आमदार,खासदार नगरसेवक हे विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जात असतात. पण आज मंत्री सत्तेकडून विरोधी पक्षाकडे गेले. या घटनेची ३३ देशांनी नोंद घेतलेली आहे. माझ्यासोबत गेले १५ दिवस शिवसेनेचे जे ४० आणि सहयोगी पक्षाचे ११ असे आमदार आहेत. त्यांनी माझ्यासोबत विश्वास ठेवला आणि मोठा निर्णय घेण्याचं धाडस केलं. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“मी पुन्हा आलो पण येतांना एकनाथ शिंदेंना घेऊन आलो”
ज्यावेळी १७ वर्षांचा बाळासाहेबांच्या विचाराने मला वेडं केलं, तेव्हाच मी शिवसैनिक झालो. आनंद दिघे यांच्याशी भेट झाली. वयाच्या १८ व्या वर्षी शाखा प्रमुख झालो, वरिष्ठ असताना ही संधी मिळाली. १९९७ ला नगरसेवक झालो. पाच वर्ष आधीच होऊ शकलो असतो, पण तिथल्या कार्यकर्त्याला युतीत तिकीट देण्याचा निर्णय झाला, मी पदाची लालसा कधीच केली नाही. यानंतर कामाला सुरूवात केली ते मागे वळून पाहिलं नाही. कधीच कुटुंबाचा विचार केला नाही. आमचे बाप काढले, कुणी प्रेत म्हणालं. कुठल्या थराला चाललोय आपण. माझ्या आमदारांना सांगितलं होतं कधीही चिंता करू नका, तुमच्या आमदाराकीची, निवडून येण्याची, तुमचं नुकसान होतंय असं वाटेल त्या दिवशी तुम्हाला सांगेन आणि मी जगाचा निरोप घेईल, असंही एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सांगितले. एक ग्रामपंचायत सदस्य सुद्धा इकडे तिकडे जात नाही, हे का झालं याच्या मुळाशी आपण जायला हवं होतं. एवढी बदनामी केली, चर्चेला माणसं पाठवली आणि इकडे पदावरून काढून टाकलं. सगळं काही बेकायदेशीरपणे केलं. पुतळे जाळायला लावले. घरावर दगडफेकीचे आदेश दिले, एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत करणारा अजून पैदा झालेला नाही, मधमाशांचं मोहोळ उठतं तस माझ्यावर हात उचलणाऱ्या डसणारी लोक आहेत. एकनाथ शिंदेंने रक्ताचं पाणी केलंय. असंही देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेंकडील लोकं इडीमुळेच आमच्याकडे आलेत; देवेंद्र फडणवीस
एकीकडे सत्ता होती आणि दुसरीकडे कार्यकर्ता, सैनिक पण तो मात्र बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक होता. या ५० जणांचा अभिमान वाटतो. त्यांनी कुठे चाललोय, किती दिवस लागतील हे काहीही विचारलं नाही. मतदानाच्या दिवशी मला जी वागणुक मिळाली, त्याचे साक्षीदार हे आमदार आहेत. अन्यायाविरूद्ध न्याय मागण्यासाठी बंड, उठाव काहीही करावं लागतं. हे सांगितलं होतं. यानंतर काय झालं माहित नाही. पण त्यानंतर लोक येत राहिले आणि काय झालंय, कुठे चाललोय काहीही समजलं नाही. मला विचारण्यात आलं कुठे चाललात, माहित नाही, असं मी सांगितलं. जर या बंडखोर आमदारांना भविष्य़ातील निवडणुकीत निवडून आले नाहीतर तर गावाकडे जाऊन शेती करणार असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
शिंदे सरकारने बहुमत जिंकलं; भाजप शिंदे गटाला 164 तर दोन आमदार तटस्थ
बंडखोरी करण्यामागचा कार्यक्रम हा एक दिवसाचा नव्हता. सुनिल प्रभूनांही माहिती आहे. कसं माझं यामध्ये खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सूरू होता. हा शिवसैनिक आहे. जे काही होईल ते होऊ दे असं ठरवलं, लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही असं ठरवलं. या दरम्यान माझाही बाप जिवंत आहे, बाप काढला. एकदा गावाला होतो. आईला सांगितलं उद्धव साहेबांचा फोन आलाय, आई साधी होती. आईने सांगितलं, माझ्या बाळाला सांभाळा, उद्धव ठाकरे साहेब म्हणाले एवढे मोठे झालात तरी आई तुम्हाला बाळच म्हणते , मी जेव्हा घरी जायचो तेव्हा आई वडिल झोपलेले असायचे, उठायचो तेव्हा ते कामाला गेलेले असायचे, कधी तरी भेटलो तर भेटायचो, हीच परिस्थिती माझ्या श्रीकांतसोबत झाली. मी उठायच्या आधी तो जायचा, बाप म्हणून कधीच त्याला वेळ देऊ शकलो नाही. शिवसैनिक हेच मी कुटुंब मानलं, माझ्या आयुष्यात जेव्हा दु:खद प्रसंग आला. दोन मुलं डोळ्यासमोरून गेली असं म्हणत भर सभागृहात एकनाथ शिंदे यांना अश्रू अनावर झालेत.
Read also
- “एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत करणारा अजून पैदा झालेला नाही”
- “बंडखोर आमदार निवडून आले नाही तर शेती करणार, मी शब्द देतो”
- “ज्यांची लोकांमधून निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात”; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर घणाघात
- अजित पवारांची खुर्ची आता फडणवीसांना अन् फडणवीसांची खुर्ची अजित पवारांना
- “लक्षात ठेवा..! भुजबळ, राणे साहेबांनी शिवसेना फोडल्यानंतर एकही आमदार निवडून आला नाही”