वर्धा : देशात लोकसभेची निवडणुक लागली आहे. यापुर्वीसुद्धा अनेक निवडणुका आपण पाहिल्या आहेत. परंतु ही निवडणुक आगळी-वेगळी आहे. या निवडणुकीमध्ये जो काही निकाल घ्यायचा आहे तो निकाल घेण्याच्या संबंधीची भूमिका आपण जाणकर पद्धतीने घेतली नाही तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला आणि पुढच्या पिढ्यांना द्यावी लागेल. अशी शक्यता शरद पवारांनी वर्धा येथे व्यक्त केली. वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे यांच्यासाठी प्रचार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिल्लीतील आपचे खासदार संजय सिंह देखील हजर होते.
हेही वाचा…“अगोदर काय घडले हे विसरुन जा अन् उद्याचा उष:काल येण्यासाठी..,” तटकरेंनी केलं मोठं आवाहन
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, आज विश्वासानं देशातल्या जनतेनं ज्यांच्या हातामध्ये देशाचा कारभार सोपवला. त्या गृहस्थांनी सत्ता हातात आल्यानंतर त्यांच्या भूमिकेपेक्षा त्यांच्या विचारांच्यापेक्षा वेगळ्या मतांची मांडणी कुणी केली . तर त्यांना जेलची हवा दाखवण्याच्या संबंधीचं काम केलं. आताच याठिकाणी आपण त्यांच्याविषयी भाषण ऐकलं, ते दिल्लीचे खासदार अतिशय उत्तम काम करणारे, लोकांच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी संघर्ष करणारे. कुठं तरी केंद्र सरकारचं धोरण चुकीचं आहे हे कळल्यानंतर त्यावर टीका टिप्पणी केली. ६ महिने त्यांना जेलमध्ये टाकलं.
हेही वाचा….“आपल्या भागात विकास निधी खेचून आणण्यासाठी महायुतीला साथ द्या”, अर्चना पाटलांचं आवाहन
आज दिल्ली देशाची राजधानी आहे, पण त्या राजधानीचा चेहरा मोहरा बदलण्याची कामगिरी ज्यांनी केली, आणि सर्वसामान्य कुटुंबातून येऊन उत्तम प्रकारचं प्रशासन दिल्लीकरांना दिलं ते अरविंद केजरीवाल प्रधानमंत्र्यांच्या धोरणासंबंधी कुठे काहीतरी उद्गार काढले, तर आज त्यांना तुरुंगात टाकलं. याचा अर्थ हा की, या देशामध्ये वेगळ्या प्रकारची हुकूमशाही आणण्याची पावलं आज दिसतात. आणि त्याबाबतीत आपण जागं राहिलो नाही तर माझी खात्री आहे की, या देशात तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं जीवन हे उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही शरद पवारांनी दिला.
दरम्यान, या देशाला योग्य रस्ता दाखवण्यासंबंधी सामान्य माणसाचा अधिकार जतन करण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांसमोर घटनेमार्फत, संविधानामार्फत दिली. आज त्या संविधानाला धक्का द्यायला, त्याच्यात बदल करणार, त्याच्यात दुरुस्ती करणार आणि सामान्य माणसाचा अधिकार जो आहे तो काढून घेणार, त्याच्यातून मोदींना अधिक अधिकार देणार, या प्रकारची भूमिका सत्ताधारी पक्षाचे आजचे पार्लमेंटमधले लोक मांडत आहेत. असेही शरद पवारांनी म्हटलंय. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना तिला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला तर सबंध हिंदुस्थान उठेल आणि त्या सरकारला एक प्रकारची अक्कल शिकवल्याशिवाय राहणार नाही. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…आढळरावांच्या पाठबळासाठी मंचरकर एकत्र, म्हणाले, आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र..
हेही वाचा…“नाशिकच्या जागेसाठी भुजबळांना उमेदवारी द्या, भुजबळांसाठी समता परिषद मैदानात”
हेही वाचा…“हा माझा शब्द असून तो मी पाळणारच”, सुनेत्रा पवारांना नागरिकांना दिली ग्वाही