मुंबई : गुजरातच्या सुरत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषीत करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी तसेच पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्यानंतर अन्य ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती टिका केलीय.
याबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लोकशाही कशी धोक्यात आहे याची क्रोनोलॉजी समजून घ्या. सुरतमध्ये काँग्रेसचे पहिले उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर सुरतमधून काँग्रेसच्या दुसऱ्या पर्यायी उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर भाजप उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. (की मागे घेण्यास भाग पाडले गेलं?) आणि मग सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना ‘बिनविरोध’ विजयी घोषित करण्यात आले.
निवडणूक आयोग वारंवार सांगतो की सर्वांना समान संधी आणि न्याय मिळाला पाहिजे, परंतु तेदेखील सत्ताधा-यांच्या हातातले बाहुले झाले आहेत. अन्यथा ही परिस्थिती उद्भवली नसती. हे ‘मॅच फिक्सिंग’ आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत कारण सध्या ते बिथरले आहेत. दहा वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही त्यांच्याकडे मतदारांना सांगण्यासारखे काही नाही. भाजपच्या उमेदवारांचे तर काहीच कर्तृत्व नाही. अशी टिकाही त्यांनी केलीय.
त्याचबरोबर मोदींकडे निवडणूक सभांमध्ये बोलण्यासाठी काही नाही म्हणून ते हिंदू-मुसलमान या मुद्याकडे वळले आहेत. उमेदवारी भरण्याच्या पातळीवरच सर्व यंत्रणा मॅनेज करूनच ही लोकं ‘४०० पार’चा नारा देत आहेत. म्हणून आम्ही वारंवार सांगतोय ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक आहे. असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“नाशिकच्या जागेसाठी भुजबळांना उमेदवारी द्या, भुजबळांसाठी समता परिषद मैदानात”
हेही वाचा…“हा माझा शब्द असून तो मी पाळणारच”, सुनेत्रा पवारांना नागरिकांना दिली ग्वाही
हेही वाचा…“अगोदर काय घडले हे विसरुन जा अन् उद्याचा उष:काल येण्यासाठी..,” तटकरेंनी केलं मोठं आवाहन
हेही वाचा….“आपल्या भागात विकास निधी खेचून आणण्यासाठी महायुतीला साथ द्या”, अर्चना पाटलांचं आवाहन
हेही वाचा….“पक्षासाठी कोरड्या विहिरीत उडी मारण्याची माझी तयारी”