मुंबई : एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ही एकनाथ शिंदे यांना का सुरक्षा देण्यात आली नाही, असा सवाल देखील सुहास कांदे यांनी केला आहे. हिंदुविरोधी वाद्यांना सुरक्षा दिली जाते परंतु हिंदुत्वासाठी लढणाऱ्याला सुरक्षा दिली जात नाही. याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. त्यावर आता शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सुहास कांदे यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
“तर लोकं तुम्हाला काय बोलतात ते ही ऐका “? केसरकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
सुहास कांदे यांच्या आता पायाखालची वाळू सरकू लागली आहे, म्हणून ते उद्धव ठाकरे यांच्यावर अशा प्रकारे आरोप करीत आहेत. झे़ड प्लस, वाय ही सुरक्षा पुरवणे हा केंद्राचा विषय असतो, सुरक्षेच्या बाबतीत रोंग नंबर लागला आहे, आता केंद्राने या गद्दारांना वाय सुरक्षा पुरवली आहे. शंभुराज देसाई यांच्याकडे ग्रामीण सुरक्षा विभाग येतो. त्यामुळे मातोश्रीवरून फोन गेला हा आरोप खोटा आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते मग सगळा अभ्यास त्यांनीच केला का?
आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात जातात. त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, जनता आणि शिवसैनिक त्यांच्यासोबत नाहीत, त्यामुळे हे निवेदन देत आहेत. इतके दिवस त्यांना सुचलं नाही का निवेदन द्यायचं. स्वत:च्या पक्षाप्रमुखाला पदावरून काढणे हा उठाव नसून नद्दारी आहे, आणि हा उठाव असेल तर मग केंद्रात जाऊन अमित शहांचे पाय का चाटता, जनाधार सोबत नाही म्हणून हा आरोप आहे, यांनी शिवसेना सोडून समोर येऊन दाखवावे असा इशारा देखील अंबादास दानवे यांनी दिला आहे.
“उद्धव ठाकरे आजारी पडलेत तेव्हाच शिंदेंनी मुख्यमंत्री होण्याची चाचपाणी सुरू केली”
शंभुराजेंना वर्षा बंगल्यावरून फोन आला होता की एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका. का सुरक्षा दिली नाही. असा सवाल देखील त्यांनी केला. यावर काॅंग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. सुरक्षा देण्यामागे गृहराज्यमंत्री घेत असतात तो निर्णय मुख्यमंत्री हे घेत नसतात. चिप सेक्रेटरीच्या खाली एक समिती असते. त्यावर ते अभ्यास करतात. मग सुरक्षा दिली जाते. तसेच एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना पोलीस खातं अधिक सुरक्षा देते यावर काही तथ्य नाही. असंही सतेज पाटलांनी म्हटलं आहे.
Read also
- महाराष्ट्रातील ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ नेते, कामासाठी ‘दादा’..; रोहित पवारांच्या अजित दादांना हटके शुभेच्छा
- “शिंदेंना जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा उद्धव ठाकरेंनी का सुरक्षा दिली नाही”
- नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा होणार; सुहास कांदे, आदित्य ठाकरे येणार आमनसामने
- एक स्वयंशिस्त, रोखठोक गतिमान अन् दुसरा राज्याच्या राजकारणातील नव्या पर्वाचा जनक
- राष्ट्रवादीतून लांडे-पानसरे ‘बेदखल’; शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दुफळी