सांगली : ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्री छगन भुजबळांनी मागील काही महिन्यांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये, म्हणून भुजबळांनी विरोध केलाय. तर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालचं पाहिजे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलीय. राज्यात सुरू असलेल्या या वादावरून राजकीय वातावरण चांगलचं चिघळलं आहे. यातच आता अखिल भारतीय परीट समाजाने भुजबळांवर टिका केलीय.
हेही वाचा..“एक दुसऱ्याच्या मानेवर बसण्याची गद्दारांची सुरूवात झालीय”, जागावाटपावरून महायुतीत कलह, ठाकरे गटाची जोरदार टिका
छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते नाहीत, सत्तेत राहून भुजबळांनी केवळ नातेवाईकांनाच सत्तेचा वाटा दिला. त्यामुळे भुजबळांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात एकही ओबीसी नेता होऊ शकला नाही.असा गंभीर आरोप अखिल भारतीय परीट समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी केला आहे. तसेच राज्यातल्या १२ बलुतेदारांचा भव्य ओबीसी महामेळावा येत्या २१ जानेवारीला सांगलीमध्ये पार पडणार असल्याचीही माहिती शिंदे यांनी दिली.
हेही वाचा…“त्या” किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरलं होतं”, जरांगे पाटलांनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात आरक्षणावरून जोरदार खडाजंगी बघायला मिळतेय. मनोज जरांगे पाटलांनी संपुर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सभा घेतल्या. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून मंत्री छगन भुजबळ यांच्या देखील सभा होत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा..“हेच जागा वाटपाचं समीकरण असणार”, अशोक चव्हाणांनी सांगितला आघाडीचा फॉर्म्युला
हेही वाचा…महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉम्युला ठरला का ? जयंत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा..ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं..! ‘या’ लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार
हेही वाचा…मिरजेत ठाकरे अन् शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांत भिडले, शिवसेना कार्यालयावरून मोठा राडा
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली,” सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर जहरी टिका