जालना : येत्या २० जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी गावातून आम्ही मुंबईकडे कुच करणार आहोत. अंतरवाली सराटीपासून सुरू झालेला पायी प्रवास हा पुढे नगर, पुणे लोणावळा मार्गे मुंबईत धडकणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर आपण उपोषण सुरू करणार आहोत. यादरम्यान ज्यांना ज्यांनी शक्य झालं त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावेत. या आंदोलनादरम्यान लागणाऱ्या सर्वच गोष्टी सोबत घ्या. असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांची तक्रार चंद्रकांत पाटलांकडे; जिल्हा नियोजन समितीत मोठा वाद
अंतरवाली सराठीपासून सुरू झालेला पायी प्रवास हा मुंबईतील आझाद मैदानावर थांबणार आहे. यादरम्यान आंदोलरकांनी रोजच्या वापरातील सर्व वस्तू सोबत घेण्याचे आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे. यामध्ये झोपण्याची, खाण्याची आणि जेवण्याची व्यवस्था आपल्या वाहनात करा. थंडी आहे. सोबत जास्तीचे कपडे ठेवा, लाकडे घ्या, तसेच आपल्या वाहनासाठी लागणाऱ्याही गोष्टी सोबत असू द्या. जीवनाश्यक वस्तूंसह स्वत: च सज्ज व्हा. अवलंबून राहू नका. लग्न, कार्यक्रम बाजूला सारून शेतीची सर्व कामं करून घराबाहेर पडा. आता आपण आरक्षण घेतल्याशिवाय आपण माघारी फिरायचं नाही. असंही जरांगे पाटील म्हणाले.
जालना जिल्हातील अंतरवाली सराटी गावापासून मोर्चा सुरू होणार आहे. पुढे बीड जिल्हातील शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, मातोरी, खरवंडी येथून पुढे अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. अहमदनगरमधील पाथर्डी, तीसगाव, करंजी घाट, अहमदनगर, केडगावातून पुढे पुणे जिल्ह्यात मोर्चा प्रवेश करणार आहे. तर पुणे जिल्ह्यातील सुपा, शिरूर, शिक्रापुर रांजणगाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, पुण्यातून पुणे एक्सप्रेसमार्गे लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर ते आझाद मैदान असा मार्ग असणार आहे.
हेही वाचा…“काकांच्या सवालीत वाढलेल्या अजित पवारांमध्ये बराच फरक”, अजित पवारांना आव्हाडांनी चांगलचं सुनावलं
दरम्यान,. आमच्या मोर्चातील मराठ्यांना गावकऱ्यांनी सहाय्य करावे. तसेच मुंबईच्याही लोकांना विनंती आहे की त्यांनी देखील आम्हाला मदत करावी. प्रत्येकानं नेमून दिलेल्या तुकडीसोबत राहावं. आंदोलनादरम्यान कुणी काही वाकडं करत असेल किंवा व्यसन करत असेल तर त्याला पोलिसांच्या हवाली करा. देशात कुणी अशी धडक मारली नसेल तशी मुंबईत धडक मारा.मोर्चात कुणी शिरलं तर त्याला लगेच बाहेर काढा. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा.महायुतीतून कधी बाहेर पडणार ? बच्चू कडूंनी थेट स्पष्टच सांगितलं
हेही वाचा“वय अन् वास्तव माहिती नसल्यामुळे ‘त्या’ अजितदादावर आरोप करताहेत”, शालिनीताई पाटलांना अजित पवार गटाचं प्रत्युत्तर
हेही वाचालोकसभा निवडणुकीसाठी वंचितसोबत युती करणार की नाही ? शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले..
हेही वाचा…“डॉ. पंजाबराव देशमुखांना भारतरत्न पुरस्कार मिळावा,” देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली इच्छा
हेही वाचा…“मी परत खासदार झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा”, लोकसभा लढण्याची खैरेंनी व्यक्त केली पुन्हा इच्छा