मुंबई : मुंबईच्या ताडदेव परिसरातील कमला इमारतीत आज भीषण आगीची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत. 20 मजली इमारतीच्या 18 व्या मजल्यावर सकाळी साडे सातच्या सुमारास ही आग लागली आहे. मात्र या घटनेतील जखमींना काही रुग्णालयांनी उपचारांसाठी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचे आरोप स्थानिकांनी केले आहेत.
माझी वाटचाल सांघिक, एकाधिकारशाहीला म्हापशेकर नाकारतील; भाजपा उमेदवार जोशुआ डिसोझांचा पलटवार
कोरोना चाचणी आणि पैशांअभावी या रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यास नकार दिल्याचे म्हटले जातेय. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट, रिलायन्स आणि भायखळा येथील मसिना रुग्णालयाने या रुग्णांना उपचारांसाठी नकार दिल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. त्यामुळे जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वेळीच या लोकांना उपचार मिळाले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते. असंही या स्थानिकांनी सांगितले आहे. या घटनेवरून आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.
If it is true then, BMC & State administration should fix the responsibility for these deaths & take action against those responsible.#MumbaiFire #tardeo
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2022
मुंबईतील आग दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांबद्दल मी सहानुभुती व्यक्त करतो. मात्र दुर्घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणामुळे मृतांचा आकडा वाढल्याची माहिती आहे. ही गोष्ट खरी असेल तर मुंबई महापालिका आणि राज्य प्रशासनाने याची दख घेत तात्काळ कारवाई करावी. तसेच संबंधित जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई व्हावी, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
Read also:
- मुंबईतील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना; मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 7 लाखांची मदत
- नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’ च्या भूमिकेत; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
- अमोल कोल्हेंच्या नथूराम गोडसेंवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… निवडणूकी आधीच…
- भाजपला सोडचिठ्ठी देऊन उत्पल पर्रिकरांचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पत्र
- डिपॉझिट गेले तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और भी लढेंगे; गोव्यात संजय राऊतांचा हल्लाबोल