मुंबई : उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिकावेशनात विरोधी पक्षाच्या भूमिकेतून भाजप सत्ताधारी सरकारला पूर्णपणे घेरण्याच्या स्थितीत आहे. त्याचेच संकेत आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतून मिळाले. राज्यातील ऊस गाळपाचा प्रश्न, वीजेचा प्रश्न, मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्न सुटलेले नाहीत, तसेच राज्यातील भ्रष्टाचार चरम सीमेला पोहोचलाय, हे भ्रष्टाचारी सरकार आहे, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या वाईन धोरणावर टीका करताना, सरकारनं हा निर्णय शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतला नाही तर बेवड्यांसाठी घेतला आहे. हे बेवड्यांना समर्पित सरकार आहे, असा ठपका देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला.
बाप, बेटा, 3 सेंट्रल एजन्सी अधिकारी, वसुली एजंट तुरुंगात जाणार; संजय राऊतांचा सूचक इशारा
महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातले परिक्षांचे घोटाळे संपले नाहीत, भ्रष्टाचार चरम सिमेला पोहचलाय. हे आतापर्यंतचं सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार आहे. कारकून साहेबाला लाच मागतोय, तुम्हाला 15 लाख मिळाले, मला 2 लाख का नाही? असा सगळा पर्कार आहे. बंदुकीचा धाक दाखवल्याचेही प्रकार झाले आहेत. एकूणच सरकार पूर्णपणे फेल झालं, या सरकारला एकच घटक जवळचा वाटतो, तो म्हणजेच दारु उत्पादन करणारा, बेवड्यांना समर्पित हे सरकार आहे, बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतलेले नाही. त्यामुळे सरकारचे काळे कामं बाहेर काढू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
नारायण राणे हजर हो! दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राणेंना चौकशीसाठी बोलवले जाणार
दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे भाजप मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा अधिवेशनात लावून धरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Read also:
- ठाकरे सरकार, संजय राऊतांचे कपडे उतरावयचे होते, म्हणून नीलला अर्ज करायला लावला – किरीट सोमय्या
- कितीही गोंधळ घाला, नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी विरोधकांना ठणकावलं
- नवाब मलिकांच्या वेळी जे केले, तेच आताही करणार; प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी राष्ट्रवादी मैदानात
- आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे गोत्यात येणार? ड्रग्झ सापडले नसल्याचा एसआयटीचा अहवाल
- आर्यन खानला दिलासा; चौकशी समितीकडून आली सर्वात महत्त्वाची माहिती