मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या घोषणा काही दिवसांवर होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेला वेग आलाय. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यावर असून केवळ ८ लोकसभा मतदारसंघ वगळता उर्वरित ४० जागा कोणी लढवायच्या याबाबत महाविकास आघाडीत एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. यातच ठाकरे गटाला ४८ पैकी १८ जागा मिळण्याची शक्यता असून मुंबईतील चार जागांचा यामध्ये समावेश आहे. त्या दृष्टीने आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…जरांगे पाटलांचा सरकारच्या विरोधात पुन्हा एल्गार, तारिख अन् स्थळ ठरलं, सर्वात मोठं आंदोलन होणार
मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार लोकसभा मतदारसंघात ठाकरे आपले उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत. यातच ठाकरे गटाकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघात एकूण १८ समन्वयकांची नियुक्ती केली होती. यामध्ये दक्षिण मुंबईसाठी सुधीर दळवी, सत्यलवान उभे, दक्षिण मध्य मुंबईसाठी रवींद्र मिर्लेकर, वायव्य मुंबईसाठी विलास पोतनीस आणि ईशान्य मुंबईत दत्ता दळवींची नियुक्ती केलीय.
हेही वाचा..मराठा विरूद्ध मराठा संघर्षाला सुरूवात ? “जरांगे खोटारडा माणूस, त्यांनी फसवलंय,” जरांगे पाटलांवर सर्वात मोठा आरोप
यातच यातच महायुतीतील शिंदे आणि भाजपच्या उमेदवारांना हरवण्यासाठी ठाकरे गट यावेळी तगडे उमेदवार मैदानात उतरवणार आहेत. यावेळी दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत. यांनाच पुन्हा उमेदवारी मिळू शकते. तर दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरेंचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले अनिल देसाईल लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्याआधी ते राज्यसभेचे खासदार होते. तर वायव्य ईशान्य मुंबईतून अमोल किर्तीकर हे शिंदे गटात गेलेले त्यांचे वडील गजानन किर्तीकर यांच्या विरोधात निवडणूक लढतली. तर ईशान्य मुंबईतून दिना पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगेंच्या मुलांमध्येही अंहकार, पाच गुप्त बैठका, अजय महाराजांचे जरांगेंवर काय काय आरोप ?
हेही वाचा..सुप्रिम कोर्टाचा भाजप सरकारला दणका..! चंदीगड महापौर निवडणूक गैरव्यवहार प्रकरण
हेही वाचा..अजय बोरसकर हा भोंदू महाराज, सरकारचा ट्रॅप, जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“कांदा निर्यात बंदीचा निर्णय फसवा,” विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारसह केंद्रावर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…जरांगेंना काडीचीही अक्कल नाही, सहकारी मित्राचाच जरांगे पाटलांवर जोरदार घणाघात