नाशिक : मागील काही दिवसापासून टोमॅटोचा भाव कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. तर यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहे. यातच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाशिकमध्ये आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. जर केंद्र सरकारने आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं नाही तर केंद्रीय मंत्र्यांच्या दारासमोर कांदे फेकल्याशिवाय स्वाभिमानी संघटना स्वस्त बसणार नाही, असा इशारा स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी राज्य सरकारला दिला आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाकडून ५०० तर शिंदे गटाकडून ६००० पानी उत्तर, कोर्टातील ‘ती’ सुनावणी फार महत्वाची
आज टोमॅटोचा बाजार खूप खाली गेलं आहे. जेव्हा बाजारात टोमॅटोचा भाव वाढला होता. तेव्हा सरकारने नेपाळमधून आयात केली. तेव्हा नाफेडमार्फत खरेदी केली. टोमॅटोचा भाव खाली गेल्याने आता शेतकऱ्यांच्या हातात १ ते २ रूपयांचा भाव मिळत आहे. अशा वेळेस केंद्र सरकार झोपा काढत आहे का ? यावेळी केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून ५० रूपये किलोने खरेदी केली पाहिजे आणि पडलेल्या बाजारभावातून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे.
हेही वाचा…राज्यातील ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाला शरद पवारांचं बळ, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली
देशातील आजूबाजूचे व्यापारी भारतातील टोमॅटो आणि कांदा करीत नाही. त्यामुळे भाव पडला आहे. केंद्र सरकारची धरसोड आयात निर्यात वृत्ती यासाठी कारणीभूत ठरली आहे. दुसऱ्या बाजूला बांग्लादेशाने टोमॅटोच्या आयातीवर एका कॅरेटला अकराशे रूपये आयात शुल्क लावलं आहे. तर आपल्या परराष्ट्र मंत्री, आपले छप्पन इंचाची छाती असणारे पंतप्रधान काय करीत आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा…कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकाच ठिकाणी, अजित पवार अन् फडणवीस विरोधात आंदोलन करणार
आज शेतकऱ्यांची माती होत आहे. त्याच्यामागे केंद्र सरकारची नितीच कारणीभूत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या सर्वांमधून दिलासा दिला पाहिजे. यासाठी स्वाभिमान संघटना शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरली आहे. जर केंद्र सरकारने आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं नाही तर केंद्रीय मंत्र्यांच्या दारासमोर कांदे फेकल्याशिवाय स्वाभिमानी संघटना स्वस्त बसणार नाही. असा इशाराही देण्यात आला.
READ ALSO :
हेही वाचा…अबब..! मराठवाड्यासाठी शिंदेंनी दिलं तब्बल ‘इतक्या’ कोटी रूपयांचं पॅकेज, आकडा ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा…“शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी, मोर्चेकरी दारावरी, सरकार झाडतंय बंदोबस्ताच्या फैरी”
“तुम्ही अडीच वर्ष माशा मारत होतात का ?”, फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल
हेही वाचा…मोठी बातमी…! छत्रपती संभाजीनगर अन् धाराशीव शहाराच्या नामांतरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
हेही वाचा…उद्धव ठाकरे हेच सर्वोत्तम मुख्यमंत्री ! सर्व्हेत ठाकरेंना जनतेची पसंती, शिंदेंना फक्त ३.९० तर फडणवीसांना ६.७६ टक्के पसंती