छत्रपती संभाजीनगर : जवळपास सात वर्षानंतर राज्य मंत्रिमंडळाची मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक होत आहे. या बैठकीवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तर तब्बल १६ मोर्चे मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी निघाले असून शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर देत जोरदार पलटवार केला आहे.
हेही वाचा…कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकाच ठिकाणी, अजित पवार अन् फडणवीस विरोधात आंदोलन करणार
मागच्या वेळी संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. त्या बैठकीतील जवळपास सर्वच निर्णयांची अंमलबजावणी झाली आहे. त्याची माहिती देखील आम्ही पत्रकारांना देणार आहोत. जी लोक आजच्या बैठकीत काय झालं विचारत आहेत. त्यांना माझा एक सवाल आहे की अडीच वर्षामध्ये मराठवाड्यासाठी तुम्ही काय केलं आहे ? एखादा निर्णय मागे राहिला असेल ,तो पुर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती. तुम्ही अडीच वर्ष माशा मारत होतात का ? असा खोचक सवाल फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
हेही वाचा…“कॅबिनेटची बैठक, अति उत्साहात सरकार ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार”
दरम्यान, मराठवाडा वॉटरग्रिडचा मुडदा पाडण्याचं काम ज्या सरकारने केलं आता तेच लोक आम्हाला विचारत आहेत. जे दिलं होतं त्याचाही मुडदा पाडला. यांना मराठवाड्याशी घेणंदेणं नाही. जर मराठवाड्याच्या हितासाठी बैठक होत असेल तर ती हाणून कशी पाडायची हा यांचा कावा आहे हे कावेबाज लोक आहेत. अशी टिकाही त्यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! छत्रपती संभाजीनगर अन् धाराशीव शहाराच्या नामांतरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
हेही वाचा…उद्धव ठाकरे हेच सर्वोत्तम मुख्यमंत्री ! सर्व्हेत ठाकरेंना जनतेची पसंती, शिंदेंना फक्त ३.९० तर फडणवीसांना ६.७६ टक्के पसंती
हेही वाचा…ठाकरे गटाकडून ५०० तर शिंदे गटाकडून ६००० पानी उत्तर, कोर्टातील ‘ती’ सुनावणी फार महत्वाची
हेही वाचा…राज्यातील ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाला शरद पवारांचं बळ, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली