औरंगाबाद : मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेलंय त्या पार्श्वभूमीवर आजची राज्यमंत्रीमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे. पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. पुढची पिढी शेती करणार का? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी राज्य सरकारला केला आहे. आज राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबाद याठिकाणी होत आहे. त्यावर ते बोलत होते.
हेही वाचा…“शरद पवार अन् उद्धव ठाकरेंसाठी ‘तो’ निर्णय गेमचेंजर ठरणार” , महत्वाच्या तारखा जाहीर
शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे मराठवाड्यात सर्वात अधिक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात १८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आहे. याकडे राज्य सरकारनं गंभीरपणे पहायला हवं. इतर राज्यात, जिल्ह्यांमध्ये कामासाठी होणारे स्थलांतर अतिशय जास्त आहे. कोणताही मोठा उद्योग मराठवाड्यात आलेला नाही. त्यामुळं रोजगाराच्या बाबतीत इथल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“राणा-यशोमती ठाकूर वादात बच्चू कडूंची उडी,” फडणवीसांचा उल्लेख करत तक्रार दाखल करणार
दरम्यान, पुढे बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी पाटी आहे. पण विमान येतच नाही. दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं रूप दिले आहे. अति उत्साहात सरकार सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार अशी चर्चा माध्यमातून ऐकली. त्याचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील अशी आशा करतो.
READ ALSO :
हेही वाचा…कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकाच ठिकाणी, अजित पवार अन् फडणवीस विरोधात आंदोलन करणार
हेही वाचा…कॅबिनेट बैठकीवर ‘हे’ 15 मोर्चे धडकणार, शहराला पोलीस छावणीचे स्वरूप
हेही वाचा…ठाकरेंच्या शिलेदारांवर चौकशा अन् गुन्हे दाखल होण्याचे शुल्ककाष्ठ, आणखी एक ‘हा’ शिलेदार अडचणीत
हेही वाचा…गोकूळ संघाच्या सभेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या, महाडिक गटांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप
हेही वाचा…मराठवाड्यात राज्यमंत्री मंडळाची अलिशान बैठक; शेतकरी मात्र हैराण!