छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक येत्या १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह २९ मंत्री, सुमारे २५० सचिव, उपसचिव आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी येत आहेत. या सर्वांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटले, विश्रामगृहात खोल्यांचे बुकींग करण्यात आले आहे. यावरून आता राष्ट्रवादीने सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“..तर राजीनामा देईन,” अजित पवारांच्या दोन्ही कट्टर समर्थक नेत्यांमध्ये ताळमेळचा अभाव ?
मराठवाड्यात ०१ जानेवारी २०२३ पासून ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुमारे ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा राज्यात फार कमी पाऊस झाल्यामुळे प्रामुख्याने मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. असे असताना राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हे सरकारकडून अपेक्षित आहे. मात्र राज्य सरकार फक्त बैठकांसाठीच लाखो रुपये खर्च करतंय. हा खर्च शासकीय तिजोरीतून केला जाणार असल्याने तो सामान्य जनतेच्या पैशांच अपव्यय आहे.
हेही वाचा…गोकूळच्या सभेत मोठा राडा, महाडिक समर्थक आक्रमक, बॅरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न
दरम्यान, आजवर झालेल्या मराठवाड्यातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुक्काम हा औरंगाबाद येथील सुभेदारी या शासकीय विश्रामगृहातच पाहायला मिळाला होता. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही परंपरा मोडीत काढत फोर स्टार हॉटेलमध्ये तब्बल ३२ हजार रुपये भाडे असलेल्या अलिशान सूटमध्ये वास्तव्य करणार आहेत. यापूर्वीचा इतिहास पाहिला तर तत्कालीन मुख्यंमत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण व देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी विश्रामगृहातच वास्तव्य करण्याची परंपरा जपली होती.
मराठवाड्यात राज्यमंत्री मंडळाची बैठक अलिशान; शेतकरी मात्र हैराण!
मराठवाड्यात ०१ जानेवारी २०२३ पासून ते ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुमारे ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा राज्यात फार कमी पाऊस झाल्यामुळे प्रामुख्याने मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. असे असताना…
— NCP (@NCPspeaks) September 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार अन् उद्धव ठाकरेंसाठी ‘तो’ निर्णय गेमचेंजर ठरणार” , महत्वाच्या तारखा जाहीर
हेही वाचा…“राणा-यशोमती ठाकूर वादात बच्चू कडूंची उडी,” फडणवीसांचा उल्लेख करत तक्रार दाखल करणार
हेही वाचा…पैशाचा वारेमाफ खर्च..! “कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ?” वडेट्टीवारांचा सवाल
हेही वाचा…“जम्मू काश्मिरमध्ये तीन जवान शहीद झाले, तेव्हा भाजपच्या कार्यालयात कशाचा आनंद साजरा केला ?”
हेही वाचा…“राज्य असंतोषात धगधगत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री राजस्थानमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी”