नाशिक : शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या नाशिक आणि अहमदनगर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबतही संवाद साधला. तेव्हा त्यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे. बळीराजा संकटकाळात असतांना भाजप काय काय करीत आहे ? असा सवाल देखील त्यांनी केला.
हेही वाचा…धक्कादायक….! ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या महिलेची मुलांसमोरच चाकूने भोसकून हत्या, एकच खळबळ
यातच काल दक्षिण काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जम्मू-काश्मिर पोलीस दलातील एक कर्नल, एक मेजर आणि एक पोलिस उपअधिक्षक शहीद झाले. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार टिका केली आहे. परवाचीच गोष्ट आहे, जेव्हा आपले तीन जवान जम्मू काश्मिरमध्ये शहीद झाले, तेव्हा भाजपच्या कार्यालायत कशाचा आनंद साजरा केला जात होता, असा मलाही प्रश्न पडला. भाजपने या प्रश्नांचं उत्तर देणं गरजेचं आहे. असंही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा…शीतल म्हात्रेंची किशोरी पेडणेकरांवर जोरदार टिका, म्हणाल्या की, “सटरफटर कचोरी ताईंच्या..,”
दरम्यान, यावर्षी पाऊस पडायला सुरूवात झाली असली, तरी पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पंचनाे होतील, पण पुढे काय? म्हणून माझा प्रश्न हाच राहिल की, उद्या मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक आहे. कदाचित आत भांडणं होतात तशी भांडणं होत राहतील. कारण सरकारमध्ये तीन वेगवेगळे गट एकत्र बसले आहेत. गद्दार गॅंगही त्यात आहेत. अशी टिकाही त्यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्य असंतोषात धगधगत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री राजस्थानमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी”
हेही वाचा…“..तर राजीनामा देईन,” अजित पवारांच्या दोन्ही कट्टर समर्थक नेत्यांमध्ये ताळमेळचा अभाव ?
हेही वाचा…गोकूळच्या सभेत मोठा राडा, महाडिक समर्थक आक्रमक, बॅरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न
हेही वाचा…प्रचंड खर्च..! “मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, 1500 रु. जेवणाची एक थाळी”
हेही वाचा…“अन्यथा दलालांचे खिसे भरणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही”