अमरावती : गेल्या काही दिवसापासून खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या राजकीय वाद सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्या, परंतु प्रचार दुसऱ्याचा केला असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्यावर यशोमती ठाकूर यांनी देखील राणांना उत्तर दिलं आहे. तर या वादात आता अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली असून याप्रकरणासंदर्भात बच्चू कडू तक्रार देखील करणार आहेत.
हेही वाचा…प्रचंड खर्च..! “मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, 1500 रु. जेवणाची एक थाळी”
यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यातील वाद टोकाला पोहचला आहे. नवनीत राणांनी केलेल्या आरोपांवर यशोमती ठाकूर १०० कोटी रूपयांचा अब्रूनूकसानीचा दावा ठोकरणार आहे. तर यशोमती ठाकूर यांच्यावर नवनीत राणा पैसे दिल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांनी किती पैसे दिले आणि यशोमती ताईंना किती पैसे मिळाले याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार करणार आहोत. याची चौकशी झाली पाहिजे. असं बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“अन्यथा दलालांचे खिसे भरणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही”
दरम्यान, नवनीत राणा यांना देवेंद्र फडणवीस यांचं अभय आहे. ते नेहमी उभय देत असतात. त्यामुळे ते उठसूठ काहीही बोलत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत राणा यांना आवर घातला पाहिजे. अशा पद्धतीने भाजप पक्षाची बदनामी होत आहे. असंही बच्चू कडू म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…पैशाचा वारेमाफ खर्च..! “कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ?” वडेट्टीवारांचा सवाल
हेही वाचा…“जम्मू काश्मिरमध्ये तीन जवान शहीद झाले, तेव्हा भाजपच्या कार्यालयात कशाचा आनंद साजरा केला ?”
हेही वाचा…“राज्य असंतोषात धगधगत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री राजस्थानमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी”
हेही वाचा…“..तर राजीनामा देईन,” अजित पवारांच्या दोन्ही कट्टर समर्थक नेत्यांमध्ये ताळमेळचा अभाव ?
हेही वाचा…गोकूळच्या सभेत मोठा राडा, महाडिक समर्थक आक्रमक, बॅरिकेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न