कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची आज ६१ वी सर्वसाधारण सभा गोकूळ शिरगाव येथील पंचतारांकीत वसाहत येथील महालक्ष्मी पशुखाद्य येथील मैदानात होत आहे. परंतु या सभेच्या आधी सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने आलेत. सभेच्या आधीच विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिक महाडिक यांनी हल्लाबोल केला होता. तर महाडिक समर्थकांनी सभेत घुसण्याचा प्रयत्न केल्याने गोकूळ महासंघाची सभा तासाभरात गुंडाळण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली.
हेही वाचा…“राज्य असंतोषात धगधगत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री राजस्थानमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी”
सतेज पाटलांना गोकूळ महासंघाबाबत महाडिकांचा ठेका, महिडाकांचा टेंकर या दोन गोष्टीसोडून काहीही माहिती नाही. त्यामुळे ते याबाबत बोलायचं शक्यतो टाळतात. त्यांची ज्ञानाची क्षमता तेवढ्यापर्यंत सीमित आहे. त्याबाबत बोलायचं नाही. असं म्हणत शौमिका महाडिक महाडिक यांनी सतेज पाटलांवर हल्लाबोल केला आहे. त्यावर महाडिकांचे गुंड दारात येऊन दंगा करतात. हे कोल्हापुर आणि सहकारच्या दृष्टीने अशोभनिय आहे. असा पलटवार करत त्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं सतेज पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“..तर राजीनामा देईन,” अजित पवारांच्या दोन्ही कट्टर समर्थक नेत्यांमध्ये ताळमेळचा अभाव ?
दरम्यान, गोकूळ संघाच्या कारभारामध्ये बचत केल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात सर्वच खर्चात वाढ कशी करण्यात आली ? बाहेरील दुध आधीप्रमाणे सहकारी संस्थांकडून न घेता खासगी संस्थाकडून का घेतले जाते ? जिल्ह्यातील दुध संकलन घटलेले असताना संकलन खर्चात वाढ कशी करण्यात आली? दुध संघाची उलाढाल वाढूनही व्यापारी नफ्यात घट का ? 2022-23 मध्ये संचालक खर्चासाठी ३० लाख रूपयांची मंजूरी असताना ४९ लाख रूपये का खर्च केले ? 2020-2021 अखेर संघाच्या किती मुदतबंद ठेवी शिल्लीक होत्या? 2023 अखेर किती शिल्लक आहेत ? असे सवाल देखील शौमिका महाडिक यांनी सतेज पाटलांना केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मराठवाड्यात राज्यमंत्री मंडळाची अलिशान बैठक; शेतकरी मात्र हैराण!
हेही वाचा…“शरद पवार अन् उद्धव ठाकरेंसाठी ‘तो’ निर्णय गेमचेंजर ठरणार” , महत्वाच्या तारखा जाहीर
हेही वाचा…“राणा-यशोमती ठाकूर वादात बच्चू कडूंची उडी,” फडणवीसांचा उल्लेख करत तक्रार दाखल करणार
हेही वाचा…पैशाचा वारेमाफ खर्च..! “कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ?” वडेट्टीवारांचा सवाल
हेही वाचा…“जम्मू काश्मिरमध्ये तीन जवान शहीद झाले, तेव्हा भाजपच्या कार्यालयात कशाचा आनंद साजरा केला ?”