रायगड : महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांनी काल ऐतिहासिक नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भूमीत पोलादपूर पितळवाडीतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी तटकरे यांनी पोलादपुर येथील श्री भैरी देवीचे आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराला सुरूवात केली. त्यानंतर काल महाड विधानसभा मतदारसंघात पितळवाडी येथे पहिली जाहीर सभा झाली. त्यानंतर पोलादपुर शहरात दुसरी तर महाड लोकसभा मतदारसंघात तिसरी सभा पार पडली. या सभेतून त्यांनी नागरिकांशी संवाद साधत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…“सुनील तटकरेंवर टिका, अजित पवार गटाने आव्हाडांना जोरदार फटकारले,” म्हणाले…
महाड येथील सभेत बोलतांना तटकरे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत सरकारने काय केले विचारणाऱ्या अनंत गीते तुम्ही पाच वर्ष मोदींच्या मंत्रीमंडळात होतात. त्यावेळी तुम्ही काय केलात ? सत्ता ही उपभोगण्यासाठी नसून ती सर्व सामान्य लोकांच्यासाठी वापरायची आहे. हाच विचार करुन आम्ही सत्तेत एकत्र आलो आहोत असे यावेळी तटकरे म्हणालेत. कालबद्ध कार्यक्रम राबवतानाच सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाचे पाऊल केंद्रसरकारने उचलले आहे. त्यामुळेच जबरदस्त ताकद महाराष्ट्राच्या विकासासाठी उभी करण्याचे काम आम्ही करत आहोत. उद्याचे भवितव्य घडवल्याशिवाय शांत बसणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी बघणारी ही लोकसभा निवडणुक आहे. या तिन्ही नेत्यांची विकासाची ताकद आज महाराष्ट्र अनुभवत असून त्यांची कामे कौतुकास्पद आहेत. यावेळी आमदार भरतशेठ गोगावले आपण ‘एटीएम’ आहोत म्हणजे ‘ऑल टाईम उपलब्ध’ हे ध्येय घेऊन जनतेसाठी काम करत आहोत. पुढील पाच वर्षे ‘एटीएम’ बनून जनतेची सेवा करु असा शब्दही यावेळी तटकरे यांनी दिला.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचं काही दडपण आहे का ? सुनेत्रा पवारांनी दिले ‘हे’ उत्तर
त्याआधी पोलादपुर येथील सभेत त्यांनी विविभ गोष्टींवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, सबंध कोकणवासीयांनी कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे हे स्वप्न गेले कित्येक वर्षे बघितले आहे, हे स्वप्न पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर तुम्ही – आम्ही एकत्र मिळून काम केले तर नक्कीच कोकणचा कॅलिफोर्निया हे स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. या तालुक्यातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी २०२४ – २५ मध्ये सिंचन प्रकल्प पूर्ण झालेले असतील असा शब्द यावेळी त्यांनी दिला.
त्याचबरोबर ‘अटल सेतू’ च्या नावाने कोकणाचे प्रवेशद्वार उघड झाले आहे. या ‘अटल सेतू’ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कोकणच्या विकासाचे दालन खुले झाले असून रस्ते, महामार्ग रुपाने पायाभूत सुविधा केंद्रसरकारच्या माध्यमातून उभ्या रहात असल्याने सामान्य जनतेला निश्चितच फायदा होत असल्याचे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा लढा उभा केला, तो हा रायगड जिल्हा आहे, याची आठवण करून देतानाच अनंत गीते यांनी या मतदारसंघातील सर्वसामान्य माणसाचा विश्वासघात केला आहे, हेही सांगितले. सुखदुःखात जनतेच्या पाठिशी कायम मी उभा राहिलो आहे, त्यामुळे लोकांनी मला लोकसभेत जाण्याची संधी दिली व पुढेही देतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या सोबतीने या तालुक्याचा विकास करुया. दहा वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा देशात बघत आहोत. आता ‘विकसित भारत’ हे स्वप्न जगपातळीवर बघायचे आहे त्यासाठीच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे असल्याचे सांगितलं. आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर पहिल्यांदा तुम्ही मतदान करत आहात हे सांगतानाच रायगड लोकसभा मतदारसंघातील विकासाचा रथ डौलाने उभा करुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
READ ALSO :
हेही वाचा…“जानकरांना शिट्टी तर वंचितच्या उमेदवाराला प्रेशर कुकर चिन्ह”, अकोल्यात तिरंगी लढत अटळ
हेही वाचा…“आतापर्यंत अजितदादांशी माझी दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहा,” शिवतारे अन् सुनेत्रा पवारांची भेट चर्चेत
हेही वाचा…“अनंत गितेंवर तटकरेंचा जोरदार प्रहार,” तटकरेंनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला
हेही वाचा…“अमोल कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी..,” दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर घणाघात
हेही वाचा…“कॉंग्रेसच्या उमेदवाराची भाजपला भीती “, मोदींची चंद्रपुरात सभा, प्रतिभा धानोरकरांचा टोला