मुंबई : राज्यात सध्या विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. यासाठी नाशिक, औरंगाबाद, नागपुर, कोकण शिक्षक या मतदारसंघात निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी येत्या 30 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आज कोकण विभागाकडून महाविकास आघाडीकडून बाळाराम दत्तात्रय पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
मागच्या कालखंडात बाळाराम पाटील यांनी शिक्षकांसाटी प्रचंड काम केले. शिक्षकांच्या विविध प्रश्नांना सभागृहात आणि सभागृहाबाहेर वाचा फोडली. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा केला. आपल्याला असाच व्यक्ती पुन्हा पाहिजे म्हणून आपण प्रचंड मताधिक्याने पाटील यांना निवडून द्यावे. आजचे सरकार शिक्षकांबाबत गांभीर्याने विचार करत नाही. हे सरकार शोबाजीत जास्त व्यस्त आहे. काही नवे करण्याची या सरकारची मानसिकता नाही. अशी टिका देखील जयंत पाटलांनी केली आहे.
“कार्यकर्त्यांना अडवले, पत्रकारांना रोखले, पोलीस हतबल, यंत्रणा मुठीत” मुश्रीफांवर कारवाई
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिक्षण आणि शिक्षकांचा दर्जा वाढेल यासाठीही हे सरकार काम करत नाही. सरकारच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या पदरात काही पडेल असे वाटत नाही. शिक्षक यांना जड वाटत आहेत. प्रश्न सोडवायचे नाहीत, उलट ते वाढवायचे अशी सरकारची भूमिका आहे. म्हणून आपण ही निवडणुक गांभीर्याने घेतली पाहिजे. सर्वांनी एकत्रिपणे काम केले पाहिजे. प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून सरकारला आपल्या समोर झुकवले पाहिजे. शिक्षक आपल्या विरोधात गेले आहेत याची चुणुक शिंदे-फडणवीस सरकारला झाली पाहिजे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- सोमय्यांचे पुतळे जाळले, टाळ्या वाजवल्या, घोषणाबाजी दिली, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
- “गिरीश महाजांनाना ते क्रेडीट घेण्याची गरज नाही”; बंडखोर आमदारांचा गिरीश महाजनांना टोला
- “तुम्हीच आमच्या मनातील मुख्य़मंत्री..!” फडणवीसांकडे बोट दाखवून नवनीत राणांचं वक्तव्य
- “पदवीधर निवडणुकीतील तिकीटावरून भाजप-शिंदे गटात धुसफुस, अनेकांची नाराजी
- कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा