जळगाव : शिवसेना फोडण्यामागे भाजपचाच हात होता ? असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गट आणि राज्यात महाविकास आघाडीकडून सातत्याने केला गेला. यातच जळगाव येथील एका कार्यक्रमात भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना फोडण्यामागे भाजपाचाच हात असल्याची कबुली दिली. त्यांचं हे वाक्य आता शिंदे गटातील आमदारांनी खोडून काढलं आहे.
“सत्तेसाठी भाजपसोबत केलेली हातमिळवणी शिंदे गटाला डोकेदुखी ठरतेय”
शिवसेना सारख्या पक्षातील 40 लोकांना जमवणं अवघड गोष्ट होती. परंतु हळूहळू सगळं काही जमत गेलं. एकवेळ असं वाटतं होतं की, आमचं हे मिशन फेल ठरतंय की काय, परंतु ते यशस्वी झालं. असं गिरीश महाजन यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर कडाडून टिका करण्यात आली. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी गिरीश महाजांनाचं वक्तव्य खोडून काढलं आहे.
“दाल मैं कुछ काला..!, योगेश कदमांच्या अपघातांवर रामदास कदमांचा संशय
गिरीश महाजन यांनी केलेलं हे विधान चुकीचं आहे. आम्ही भाजपमुळे शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. तर उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येत नव्हते. आमची कुठलीच कामं होत नव्हती. आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस म्हणजे आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. याचे गिरीश महाजन यांनी क्रेडीट घेण्याची गरज नाही. असा टोलाही संजय गायकवाड यांनी लगावला.
Read also
- “तुम्हीच आमच्या मनातील मुख्य़मंत्री..!” फडणवीसांकडे बोट दाखवून नवनीत राणांचं वक्तव्य
- “पदवीधर निवडणुकीतील तिकीटावरून भाजप-शिंदे गटात धुसफुस, अनेकांची नाराजी
- कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
- कोकण विभागात आघाडीकडून बाळाराम पाटलांना उमेदवारी..! शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा धुराळा
- “कार्यकर्त्यांना अडवले, पत्रकारांना रोखले, पोलीस हतबल, यंत्रणा मुठीत” मुश्रीफांवर कारवाई