मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस युतीचं सरकार आल्यानंतर शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारमधील कामांना स्थगिती दिली. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदा राजकीय संघर्ष झाला. यासाठी महाविकास आघाडी सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता. न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारमधील कामांना स्थगिती दिल्याने शिंदे सरकारला फैलावर घेत जोरदार फटकारलं.
“मादर** संजय राऊत, तु यापुढे अशी भाषा वापरू नको”; बंडखोर आमदाराची जीभ घसरली*
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना विकास निधीवरून शिवसेनेतील काही आमदार राष्ट्रवादीवर नाराज होते. ते आमदार सातत्याने आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करीत. त्यातच एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेचे जवळपास 40 आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं.
“महाराष्ट्र द्वेषी शिंदे- फडणवीस सरकार महाराष्ट्रातून लवकरच हद्दपार करा”
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा महाविकास आघाडीतील कामांना त्यांनी स्थगिती दिली. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून टिका केली. त्यानंतर मग उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावरून शिंदे फडणवीस सरकारला आघाडी सरकारमधील विकास कामांना स्थगिती देता येणार नसल्याचं म्हटलं. त्यावरून राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
“ठाकरेंनी संजय राऊत या पोपटाचे तोंड बंद केलं पाहिजे, नाहीतर उरलेली जनताही निघून जाईल”
महाविकास आघाडी सरकारने आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राज्यातील जनतेच्या हिताची कामे केली. शेवटच्या काळात महाविकास आघाडी सरकारने लोकसेवेचा ध्यास अविरत पाळत घेतलेल्या निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकारने आडकाठी करून स्थगिती दिली. मात्र देवाच्या काठीला आवाज नसतो हेच खरं आहे, याची प्रचिती आज झाली. हायकोर्टाने या सुडाच्या राजकारणाला लगाम लावला असून राज्य सरकारने महाविकास आघाडीने सरकारच्या काळातील निर्णयांना दिलेली स्थगिती अयोग्यच होती हे हायकोर्टाने दाखवून दिलं असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
Read also
- “तर राज्यपालांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं”; उदयन राजेंचा आक्रमक पवित्रा
- “गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात, मग राज्यपाल, मंत्र्यांना का देत नाही”; संजय राऊत
- भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुण्याची ‘सुभेदारी’
- हिवाळी अधिवेशनापुर्वी मंत्र्यांना ४६ बंगले नागपुरात तयार..! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?
- “..तर आता माझ्यावर पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील”; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट