मुंबई: महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी भविष्यवाणीही अनेक भाजप नेत्यांनी केली होती. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आम्ही महाविकास आघाडी सरकारला उलथवून टाकू, असा आरोप केला आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपाच या आघाडीवर मोठ्या प्रमाणावर रोष असल्याचे दिसून आले आहे. भाजप पक्षातील अनेक नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचे काम चालू केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पण महाविकास आघाडी सरकारवर कायमच टीका करत असतात.
जे.पी. नड्डा सकाळीच मुंबई विमानतळावर दाखल झाले. मुंबईमध्ये आसाममधील आमदाराचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराचे उद्घाटन जे पी नड्डा यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यामुळेच आज सकाळी नड्डा मुंबईत दाखल झाले होते. भाजपच्या वतीने विमानतळावर जे. पी. नड्डा यांचे भव्य स्वागत करण्यात आले. जे पी नड्डा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यावेळी जे पी नड्डांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारला उलथून टाकू असा निर्धार व्यक्त करत येणाऱ्या काळात राज्यात भाजपचीच सत्ता येईल असा विश्वासही व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजकीय वर्तुळातून भाजप सरकारबद्दल तर्क वितर्क पण लावले जात आहेत.
मागील अनेक दिवसांपासून भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही अशी टीका करतच होते. हे सरकार त्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकणार नाही, असं अनेकदा भाजप नेत्यांनी बोलावून दाखवलं आहे. तर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करून पुढील निवडणूकीतही यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.