मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात नवाब मलिक प्रकरण गाजण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्याआधीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर निशाणा साधत चहापाण्याच्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बाप, बेटा, 3 सेंट्रल एजन्सी अधिकारी, वसुली एजंट तुरुंगात जाणार; संजय राऊतांचा सूचक इशारा
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अद्यापही परीक्षांचे घोटाळे संपले नाहीत. भ्रष्टाचार तर चरम सीमेला पोहचला आहे. सर्वाधिक भ्रष्टाचारी ठाकरे सरकार तयार झाला आहे. बंदुकीचा धाक दाखवल्याचेही प्रकार या सरकारच्या काळात झाले आहेत. एकुणच सरकार पुर्णपणे फेल झालं ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. पंधरा लाख रूपयावरून चिमटा काढत ते म्हणाले की, तुम्हाला 15 लाख मिळाले मला मग 2 लाख का नाही मिळाले.
नारायण राणे हजर हो! दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राणेंना चौकशीसाठी बोलवले जाणार
दारू विक्रीच्या निर्णयावर बोलताना म्हणाले की, या सरकारला दारू उत्पादन करणारा हा एकच घटक जवळचा वाटतो आहे. बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतलेले नाही. त्यामुळे सरकारचे काळे कामं बाहेर काढू असंही फडणवीस यांनी म्हटलंय.
आर्यन खानला दिलासा; चौकशी समितीकडून आली सर्वात महत्त्वाची माहिती
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष करण्याची शक्यता आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपला कडक इशारा दिला आहे. कीतीही गोंधळ घाला, नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच असं जयंत पाटलांनी विरोधकांना ठणकावले आहे.
Read also:
- ठाकरे सरकारनं दाऊदला सिंपथी ठेवणारे लोक ठेवलेत, आम्ही चहापानाला जाणार नाही – देवेंद्र फडणवीस
- ठाकरे सरकार, संजय राऊतांचे कपडे उतरावयचे होते, म्हणून नीलला अर्ज करायला लावला – किरीट सोमय्या
- कितीही गोंधळ घाला, नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी विरोधकांना ठणकावलं
- नवाब मलिकांच्या वेळी जे केले, तेच आताही करणार; प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी राष्ट्रवादी मैदानात
- आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे गोत्यात येणार? ड्रग्झ सापडले नसल्याचा एसआयटीचा अहवाल