मुंबई : राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून एक जारी केलेल्या एका शासन निर्णयात हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्याबाबत असून यावरून आता राज्यातील राजकीय नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे आता यावरून राज्यात एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारताची कुठलीही राष्ट्रभाषा नाही हे उघड सत्य असताना थेट शासनाच्या जीआरमध्ये हिंदीला राष्ट्रभाषा संबोधून भाजप नेमकं काय करू इच्छितेय. असा सवाल काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला विचारला आहे. तसेच जातधर्मावरून संघर्ष घडवल्यानंतर भाजपला आता भाषेवरून संघर्ष घडवायचा आहे का? असा खोचक सवालही त्यांनी केला.
“आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता, मात्र…;” अजित पवारांची काॅंग्रेसवर नाराजी
त्याचबरोबर हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा महान शोध लावणारे धन्य ते शिंदे-फडणवीस सरकार. हे म्हणजे हिंदी आम्हाला आवडे आणि मराठीचे वावडे हिंदीला राष्ट्रभाषा घोषित करणारे. महाराष्ट्र सरकार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणार का ? असा उलट सवाल राष्ट्रवादीने भाजपला केला आहे.
Read also
- “पक्षात होता तेव्हा पक्षाच्या घटनेवर शिंदे गटाने शिवसेनेवर आक्षेप का घेतला नाही”; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
- धनुष्यबाणावरील सुनावणी आणखी लांबणीवर..पुढील सुनावणी 20 जानेवारीला
- “निलेश राणेंसारखा घाणेरड्या वृत्तीचा माणुस या जगात कधी निर्माण झालेला नाही”
- “..तर उद्या शिंदे गटाचे वकीलही मीच मुख्य नेता असल्याचा दावा करतील”; ठाकरे गटाचा टोला
- ठाकरे अन् शिंदे गटाकडून आयोगाकडे कागदपत्र सादर, ठाकरेंकडे 18 लाखांपेक्षा अधिक तर..