पिंपरी चिंचवड : राज्याभरासह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुका फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पिंपरी चिंचवड महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. या रणांगणात खुद्द शरद पवारदेखील उतरल्याचं दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका जिंकण्यासाठी पवार यांनी योजना आखायला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या पुणे येथील बैठका आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यांनी आज (16 ऑक्टोबर) बोलताना पुणे तसेच पिंपरी चिंचवडच्या राजकारणात पहिला डाव टाकला आहे. यापूर्वी मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं होतं. याठिकाणच्या नागरिकांनी मला सहा वेळा लोकसभेत पाठवलं, असं भावनिक वक्तव्य करत रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.
साखर कारखान्याचा संचालक झाल्यावर लग्न कसं जमलं? अजित पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा!
शरद पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीलाच पिंपरी चिंचवड तसेच पुण्यावर बोलताना भावनिक भाष्य केलं. “यापूर्वी मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं होतं. येथील नागरिकांनी मला सहा वेळा लोकसभेत पाठवलं. यापूर्वी या ठिकाणी माझं जास्त जाणं-येणं असायचं पण आता जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. त्यामुळे येणं-जाणं कमी झालं आहे,” असे भावनिक उद्गार शरद पवार यांनी काढले.
गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही – महादेव जानकर
दरम्यान, पुणे महानगपालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता उलथवून लावण्यासाठी काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. येथे आमचीच एकहाती सत्ता येणार असा दावा प्रत्येक पक्ष करत आहे. तर प्रत्यक्ष निकालच विरोधकांना उत्तर देईल असे भाजप नेते सांगताना दिसतात. काही दिवसांपूर्वी पुण्याचा महापौर फक्त शिवसेनेचाच होईल असं भाष्य केलं होतं. तर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला होता. इतर ठिकाणी काय परिस्थिती झाली हे राऊतांना माहिती आहे. राऊत माझ्यापेक्षा मोठा माणूस आहे. पण निवडणुकीनंतर संजय राऊतांना काय ते कळेल, असे गिरिश बापट म्हणाले होते.
Read Also :
- भाजपच्या महापौरांनी घेतला शरद पवारांचा आशिर्वाद; पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधान
- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात माझा किंचीत हात होता; शरद पवारांची दिली कबुली
- साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना – चित्रा वाघ
- एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर असा गोंधळ घालतं – गोपीचंद पडळकर
- शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, पण…; छगन भुजबळ