नवी दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. सोबत शिंदे सरकारमधील मंत्रीमंडळ देखील असण्याची शक्यता आहे. राज्यात मागील काही दिवसापासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“हिवाळी अधिवेशन सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू व्हावे”; अजित पवारांची मागणी
राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी रान पेटवलं आहे. तसेच आज विरोधकांनी पुणे बंद ची देखील हाक दिली होती. याचा परिणाम राज्यात मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. तसेच शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून देखील विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद देखील मोठ्य़ा प्रमाणात पेटला आहे. त्यासंदर्भात देखील चर्चा करण्याची शक्यता आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून
त्याचबरोबर आगामी काही काळात अनेक निवडणुका येत आहेत. त्या अनुषंगाने मिशन 2024 अंतर्गत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा साधणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्याआधीच आज लोकसभेतील शिंदे गटातील गटनेता राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत एक पत्र देखील लिहिलं आहे.
Read also
- फडणवीसांची जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे-फडणवीसांचे मोठे निर्णय
- चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याची अन् पत्रकाराची हत्तीवरून मिरवणुक काढणार
- “पुण्यातील मुक मोर्चानंतर उदयन राजे खासदारकीचा राजीनामा द्यायला दिल्लीला”
- “साहेबांना जीवे मारण्याची धमकी तर अदखलपात्र गुन्हा, अन् पाटलांवर शाई फेक, खुनाचा प्रयत्न”
- शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…! पिंपरी-चिंचवडकरांसाठी केले तब्बल ९९५ कोटी मंजुर