पुणे : राज्यात सातत्याने होणाऱ्या महापुरूषांबाबतच्या वक्तव्यावरून आज पुण्यात सर्वपक्षीय नेत्यांनी मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राज्यातील विविध संघटनांनी सहभाग घेतला. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून मुक मोर्चा लाल महाल येथे जाऊन थांबला. या मोर्चात भाजपचे खासदार उदयन राजे देखील सहभागी झाले होते. यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुचक व्यक्तव्य केलं आहे.
“नुफुर शर्माच्याबाबत जो निर्णय घेण्यात आला, मग आता का नाही?” उदयन राजेंचा केंद्र सरकारला सवाल
उदयन राजे सुरूवातीपासून मोर्चात सहभागी झाले होते. आम्हाला वाटलं की, ते लाल महाल येथे येऊन आपले विचार मांडतील. परंतु ते याठिकाणी उपस्थित राहिले नाहीत. कदाचित महापुरूषांचा अवमान त्यांना सहन झालेला नसेल म्हणून ते तडाकाफडकी खासदारकीचा राजीनामा द्यायला दिल्लीला गेले असतील. असं आपण गृहीत धरूया. असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
ठाकरे-शिंदेंच्या न्यायालयातील याचिकांची सुनावणी आणखी लांबणीवर
आपण अत्यंत चांगले विचार करणारी माणंस आहोत. उदयन राजे यांच्याबाबत आमच्या मनात प्रचंड आदर आहे. ज्या अर्थी त्यांनी आपली भूमिका घेतली आहे. ते खासदारकीचा राजीनामा देतील. कारण ते मनाचे राजे आहेत. काहीही करू शकतात. असं आम्ही गृहीत धरतो, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
काल दोन ‘दादा’ भिडले अन् आज मंत्रालयाच्या बैठकीत एकमेकांच्याच बाजुलाच बसले
दरम्यान, देशातल्या काही विकृत माणसांमुळे 350 वर्षाच्या व्यक्तींचा इतिहास आपल्याला वारंवार सांगावा लागत आहे. हे आमचं दुर्दैव असून नुफुर शर्माच्या बाबतीत जो केंद्र सरकारने निर्णय घेतला होता. तो राज्यपालांच्या बाबतीत का घेतला नाही. ? असा सवाल उदयन राजे यांनी केंद्र सरकार करीत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
Read also
- “साहेबांना जीवे मारण्याची धमकी तर अदखलपात्र गुन्हा, अन् पाटलांवर शाई फेक, खुनाचा प्रयत्न”
- शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…! पिंपरी-चिंचवडकरांसाठी केले तब्बल ९९५ कोटी मंजुर
- “हिवाळी अधिवेशन सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू व्हावे”; अजित पवारांची मागणी
- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून
- “महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशारा आज पुणेकरांनी भाजप-शिंदे सरकारला दिला”