पुणे : आज काही विकृत माणसांमुळे आपल्याला ज्या व्यक्तींनी म्हणजे छत्रपतींनी आपलं पुर्ण आयुष्य वेचलं. त्या व्यक्तीचा सन्मान झाला पाहिजे. हे सांगण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. याच्या पेक्षा मोठी शोकांतिका काही असुच शकत नाही. अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार उदयन राजे यांनी पुण्यात मुक मोर्चात मांडली. आज राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला असून सर्वपक्षीय नेत्यांनी मुकमोर्चा देखील काढला. त्यावेळी ते बोलत होते.
पुण्यात लॉकडाऊन सारखी पुन्हा परिस्थिती..! राजकीय पक्षांकडून पुणे बंदची हाक
छत्रपती शिवाजी महाराजांवरील 350 वर्षापुर्वी जेवढा आदर, प्रेम होतं. तितकचं आजच्या काळात देखील वेगवेगळ्या धर्मांतून बघायला मिळत आहे. मात्र नुफूर शर्मांच्या बाबतीत जी काही भूमिका घेण्यात आली. ती आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, त्रिवेदी यांच्याबाबत का घेण्यात आली नाही. ? असा सवाल देखील उदयन राजे यांनी केंद्र सरकारला केला आहे.
शाई फेकणाऱ्यावर जीवे मारण्याचा गुन्हा… राज ठाकरेंनी घेतली ही भूमिका
मी या अगोदर जी भूमिका मांडली होती. त्या भुमिकेवर आजपर्यंत ठाम आहेत. पुण्यात हे आंदोलन करण्यात आले. त्यासाठी सर्वांचे आभार, तसेच आपल्या सर्वांनीच यासाठी समारे यायला पाहिजे. ते आपलं कर्तव्यच आहे. असंही उदयन राजे म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद…! वाद चिघळत असतांनाही रोहित पवारांनी गाठलं थेट बेळगाव
दरम्यान, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ पुणे असून त्याठिकाणी पुणे बंदची हाक दिली आहे. जर पुण्यामध्ये आज कडकडीत बंद सुरू असेल तर हे बंद पुढे संपुर्ण महाराष्ट्रात याचे लोण पसरेल अन् संपुर्ण महाराष्ट्र बंद होईल, अशी शक्यता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. आज राज्यपालांविरोधात सर्वपक्षीय नेत्यांकडून पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये भाजपचे खासदार उदयन राजे यांनी देखील सहभाग घेतला आहे.
Read also
- ठाकरे-शिंदेंच्या न्यायालयातील याचिकांची सुनावणी आणखी लांबणीवर
- काल दोन ‘दादा’ भिडले अन् आज मंत्रालयाच्या बैठकीत एकमेकांच्याच बाजुलाच बसले
- “आज पुणे, तर उद्या संपुर्ण महाराष्ट्र बंद होईल”, संजय राऊतांचा इशारा
- मोठी बातमी…! शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी, सिल्व्हर ओकवर धमकीचा फोन
- पुण्यातल्या मोर्चात उदयन राजे सहभागी…! तर मनसे-भाजपच्या नेत्यांनी फिरवली पाठ