मुंबई : आगामी काळात नागपुर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वी आज विधानसभेत कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी दोन्ही सभागृहातील नेते, मंत्री उपस्थितीत होते. हिवाळी अधिवेशनला येत्या 19 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात काही मागण्या केल्या आहेत.
“आज पुणे, तर उद्या संपुर्ण महाराष्ट्र बंद होईल”, संजय राऊतांचा इशारा
कोरोनामुळे २ वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी हे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली.
मोठी बातमी…! शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी, सिल्व्हर ओकवर धमकीचा फोन
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरं व्हावं, अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद केली आहे. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करण्यात यावा, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा. विधिमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरु व्हावे. अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
पुण्यातल्या मोर्चात उदयन राजे सहभागी…! तर मनसे-भाजपच्या नेत्यांनी फिरवली पाठ
दरम्यान, विधिमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 19 डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या.
Read also
- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून
- “महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशारा आज पुणेकरांनी भाजप-शिंदे सरकारला दिला”
- “नुफुर शर्माच्याबाबत जो निर्णय घेण्यात आला, मग आता का नाही?” उदयन राजेंचा केंद्र सरकारला सवाल
- ठाकरे-शिंदेंच्या न्यायालयातील याचिकांची सुनावणी आणखी लांबणीवर
- काल दोन ‘दादा’ भिडले अन् आज मंत्रालयाच्या बैठकीत एकमेकांच्याच बाजुलाच बसले