मुंबई : ज्यावेळी नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्यावर प्रचंड आरोप केले. त्यावेळी ते त्यामधून तलाखून सलाखून निघाले. त्यांची सद्विवेकबुद्धी नेहमी चांगली आहे. त्यामुळे कुणालाही विश्वास बसणार नाहीत की ते शिंदे गटात जातील. अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चेवर दिली.
“प्रभू रामाच्या शिकवणीवर राहुल गांधी यांची पदयात्रा सुरूय”
अलिकडेच युवासेनेची शिंदें गटाकडून कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक मंत्र्यांच्या मुलांचा या कार्यकारणीत यामध्ये सहभाग आहे. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, अगदी दादा भुसे यांच्या मुलांपासून ते दिलीप लांडे यांच्या मुलापर्यंत सगळ्यांची नावं आली आहेत. त्याच्यामुळे याच्यात काही नवल नाही. मुलगा खासदार आहे. भाऊ आमदार आहे. भावजय नगरसेवकी आहेत. ही सर्व नाती झाकून ठेवायची आणि बाळासाहेबांच्या आजुबाजूच्या माणसांवर बोलायचं असंही त्या म्हणाल्या.
“एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरेंचे सगळे आजार गायब झालेत”; संदीपान भुमरेंची फटकेबाजी
त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून स्वत: ला सिद्ध केलं आहे. त्यांनी युवा सेनेत चांगलं काम केलं असून त्यांनी ते करून दाखवलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर असे आरोप करायचे. तसेच त्यांची चमक महाराष्ट्राला समजली आहे. ती चमक झाकाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु सुर्य कधी झाकोळला जात नाही. त्याला ग्रहण लागतं पण ग्रहण लागल्यानंतर सुर्य आणखी तेजस्वी होतो. त्यामुळे महाराष्ट्राचं हे ग्रहण लवकरच सुटेल असंही त्या म्हणाल्या.
Read also
- भाजपशी युती नको म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांना पाटलांचा सुचक इशारा..! म्हणाले,..;
- “आता देवी सरस्वतीही वाचवू शकणार नाही, महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचे सरकार”;
- छगन भुजबळांवर गुन्हा दाखल..! जीवे ठार मारण्याची दिली धमकी
- “मोदींनीही आत्मनिर्भर व्हावं, किती दिवस दुसऱ्या पक्षातील माणसं पक्ष चालवणार”
- “सत्य, परखड बोलणारे भाजपचे एकमेव नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी”; रूपाली पाटील