मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीतील सरकार अल्पमतात आलं आहे. याचाच परिणाम म्हणून मुख्यमंत्री यांनी शासकीय निवास स्थान असलेलं वर्षा निवासस्थान काल सोडलं. त्यामुळे उद्धव ठाकरे आता लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच आज मंत्रालयातील साडेबारा वाजता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत.
“शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका”, बंडखोर आमदारांना ठाकरेंनी ठणकावलं
एकनाथ शिंदे यांच्या गटात आतापर्यंत शिवसेनेचे 41 आमदार सोबत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आता शिवसेनेचे 4 खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे शिवसेनेला आता मोठा धक्का बसला आहे. अशातच आता शिवसेनेचे 17 ते 18 आमदार भाजपच्या ताब्यात असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
एकनाथ शिंदे गटांनी उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी तो प्रस्ताव फेटाळ्याने एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता सरकार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने देखील राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपचे काही वरिष्ठ नेते देखील एकनाथ शिंदे यांना भेटण्याची शक्यता आहे.
“शिवसेेनेचे सर्व आमदार शिंदेंसोबत फक्त पैशासाठी गेलेत”; इम्तियाज जलीलांचा नवा आरोप
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलंलं बंड हे राज्यातील सर्वात मोठं बंड असून एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र येऊन सरकार स्थापन करणार आहे. या सरकारचा शपथविधी रविवारी पार पडण्याची सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आता डळमळीत होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेते 56 आमदारांपैकी फक्त 14 आमदार सोबत असुन एकनाथ शिंदे गटात 41 आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले एक एक आमदार आता शिंदे गटात सामिल होण्यासाठी गुवाहाटी येथे दाखल होत आहेत. त्यामुळे समाज माध्यांमावर राष्ट्रवादी काॅंग्रेस आता शिवसेनेला दुबळी बनवण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा रंगली आहे.
Read also:
- भाजपची अट, बंडखोर शिंदेगट भाजपमध्ये विलीन झाला तरच सरकार स्थापन; प्रकाश आंबेडकरांचं ट्विट
- “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे” आजच वर्षा बंगला सोडणार ; कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
- एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवा; पवारांचा ठाकरेंना सल्ला, शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
- “सेनेच्या बंडखोर आमदारांना सोमय्यांकडे कपडे नेऊन देण्याची जबाबदारी”; राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं
- “उद्धव ठाकरेंबद्दल आदर वाढला, नाराज आमदारांना जोरदार चपराक”; इम्तियाज जलील