बेळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्याआधी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटला आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दुसऱ्या बाजूला आक्रमक भूमिका घेतली आहे. बेळगाव याठिकाणी आंदोलन करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कर्नाटक पोलीसांनी अडवलं असून काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
अन्, स्टेजवरच सुषमा अंधारेंनी शरद पवार अन् उद्धव ठाकरेंचे घेतले आशीर्वाद, भाजपची टिका
बेळगावात महाराष्ट्र समितीच्या महामेळाव्यास परवानगी नाकारून मेळाव्यासाठी घातलेला मंडप काढण्याच्या सूचना कर्नाटक सरकारने पोलिसांनी दिल्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. मग गृहमंत्री अमित शहांसोबची चर्चा हे केवळ नाटक होतं का? असा सवालही रोहित पवारांनी केला आहे.
“राज्याच्या मातीला फुटीचा, गद्दारीचे संकट तेव्हा महाराष्ट्र पेटून उठतो” ; अजित पवार
नाटक नसेल तर शहा साहेबांनी दिलेल्या आदेशाला वाटाण्याच्या आक्षता लावणाऱ्या मुजोर कर्नाटक सरकारबाबत केंद्राने तातडीन कठारे कारवाई करावी आणि राज्य सरकारनेही मीठाची गुळणी टाकून आतातरी मराठी माणसासाठी कठोर भूमिका घ्यावी. असं म्हणत रोहित पवारांनी शिंदे सरकारवर भाष्य केलं आहे.
“देवेंद्रजी…! Cool Down, तुमचा जळफळाट आम्ही समजू शकतो”; राष्ट्रवादीने फडणवीसांना डिवचलं
दरम्यान, बेळगावात आंदोलन करण्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीचा मोर्चा कोगनळी टोळनाक्यावर जवळ अडवण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांवर कर्नाटक पोलिसांनी दडपशाही सुरू केली आहे. यामध्ये हसन मुश्रीप, संजय पवार या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे.
बेळगावात ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या महामेळाव्यास परवानगी नाकारून मेळाव्यासाठी घातलेला मंडप काढण्याच्या सूचना कर्नाटक सरकारने पोलिसांनी दिल्या आणि ‘#महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.मग गृहमंत्री @AmitShah साहेबांसोबतची चर्चा हे केवळ नाटक होतं का?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 19, 2022
Read also
- “एकदम ओक्केच्या घोषणांनी विधानभवन पुन्हा दणादणाला, हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात”
- “एकनाथ शिंदें साहेब जागे व्हा, भाजपला तुमचं नेतृत्व मान्य नाही”
- सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट; महामोर्चात भुजबळांचा हल्लाबोल
- “फडणवीसांनी राज्यपाल अन् आपल्या सहकाऱ्यांच्या बुद्धीची तपासणी करावी”, सेनेचा टोला
- “चंद्रकांत पाटलांनी घेतला शाई फेक प्रकरणाचा धसका, आता तोंडावर थेट फेसमास्क लावला”