मुंबई : वेदांता फॉक्सकॉन नंतर एअरबस प्रकल्प देखील गुजरातला गेल्याने विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर टिकेचा सुड उठवला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला मिळणार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी हा विषय बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. तसेच काल केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 2000 कोटीची प्रकल्प जाहीर केला. आता यावरून राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं आहे.
“सत्ता चुलीत गेली, आम्ही जनसामान्यांसाठी सरकारला पाठींबा दिला”; बच्चू कडूंचा एल्गार प्रहार
सगळे उद्योगधंदे राज्याच्या बाहेर घालवून हे संघ, भाजपवाले युपी, गुजरातच्या अंगणात पाणी भरतील. एकनाथराव व 40 चोर बसतील आयुष्यभर खोके मोजत. आपलं काय? कित्येक पिढ्यांच्या कष्टाने नावारूपास आलेला आपला महाराष्ट्र या खोकेबाज गद्दारांमुळे बदनाम होत आहे. हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे. असा टोला देखील राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी लगावला.
“हम तो वो बदनाम है की बदनामी हमसे डरती है”; गुलाबराव पाटलांची शायरी
अजून मोठा प्रकल्प आणू.. अजून मोठा प्रकल्प आणू म्हणता म्हणता एक दिवस मुंबई शहरही गुजरातच्या झोळीत टाकलं जाईल. मग एकनाथराव म्हणतील यापेक्षा मोठं शहर आणू.. असं म्हणत प्रशांत जगताप यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीय इलेक्टॉनिक्स धोरणातंर्गत महाराष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2000 कोटींची भेट म्हणून गुंतवणुक दिली आहे. यामधून 5000 रोजगार निर्मिती होणार आहे. असं फडणवीस म्हणाले होते. तसेच काही नेते आणि एचएमव्ही पत्रकार महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझा प्रश्न आहे, ज्यांनी रिफायनरीला विरोध केला. त्यांना गुंतवणुकीवर बोलण्याचा काय अधिकार? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला.
Read also
- “भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्राला उंचीवर नेणार”
- “रवी राणा यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर..:” सुषमा अंधारेंनी साधला निशाणा
- “राणा, कंभोज, खोत, सदावर्ते, पडळकरांना आता फडणवीसांनी गुजरातला पाठवावे”
- “रवी राणांनी माझी माफी मागितली, त्यांचे जाहीर आभार”; बच्चू कडूंनी वाद मिटवला
- “प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही, प्रहारमध्ये दहा वार करण्याची ताकद”; बच्चू कडू